आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. या निर्णयानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. तसेच मराठा समाजही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतेय. आता बीडमध्ये मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. लॉकडाऊननंतर राज्यातील पहिला आक्रमक मोर्चा बीडमध्ये निघणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना विनायक मेटे म्हणाले की, 'मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाच्या निकालानंतर बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व सर्व मराठा संघटनांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत आरक्षण लढ्याची पुढची दिशा आणि रणनीती ठरवली. पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक आंदोलन करणार असून पहिला मोर्चा बीडमध्ये होणार आहे. तो मुक नसेल अशी माहिती मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण कोर्टात टिकले नाही आता या आरक्षणाच्या लढ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे काढणार असल्याचे मेटे यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.