आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी नदी संवर्धनासाठी ‘नदीला जाणून घेऊया’ नावाचे जनजागृती अभियान सुरू केले असुन त्यांनी मांजरा नदीकाठच्या लोकांसोबत संवाद सुरू केला आहे. मात्र जिल्हाधिकारी ज्या बीड शहरात राहतात, त्या बिंदूसरा नदीची बकाल अवस्था झालेली असुन त्या बिंदूसरा नदीसोबत संवाद साधायला हवा.
या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनात शेख युनुस , मुबीन शेख, सय्यद आबेद, शेख मुस्ताक, बलभीम उबाळे, अरूण खेमाडे आदी सहभागी झाले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांना निवेदन देण्यात आले.
नदीबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे नदी शुद्ध पाण्याचा स्तोत्र असून नदीशिवाय जीवन नाही, नदीला वाचवण्याची गरज आहे. अतिक्रमण, शोषण व प्रदुषण या तीन कारणांचा अभ्यास करण्यासाठी मांजरा नदीत अभियान राबवणारे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे बिंदुसरा नदीपात्रातील अतिक्रमण, अस्वच्छता व दुषित पाणी याबद्दल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.कोणीच बिंदुसरा नदीच्या संवर्धनासाठी पुढे यायला तयार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, म्हणून हे आंदोलन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.