आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवचन:जीवनात ध्येय निश्चितीसाठी श्रीमद्‎ भागवत कथा श्रवणाची आवश्यकता‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्माला ज्ञानाची जोड असणे गरजेचे‎ असून आपण कर्म करतो याची जाण‎ असणे गरजेचे आहे. पक्षी दोन पंखावर‎ आकाशात भ्रमण करतो. तसे मानवाने‎ कर्म व ज्ञानाच्या बळावर सुंदर असलेले‎ जीवन जगणे आवश्यक आहे. ज्ञान हे‎ कृतीतून अभिव्यक्त झाले पाहिजे.‎ मानवी जन्माच्या धन्यतेत कर्म, ज्ञान,‎ उपासनेला महत्त्व असून अनेकवेळा‎ ज्ञानाने अहंकार निर्माण होतो. कर्म,‎ ज्ञान, भक्तीसाठी भक्तीची गरज असून‎ श्रद्धा असेल तरच ज्ञान निर्माण होते.‎ ज्ञान हे समर्पण शिकवते तर कर्मात‎ श्रद्धेला महत्त्व आहे.

जीवनाचे ध्येय‎ निश्चित करण्यासाठी श्रीमद् भागवत‎ श्रवण करण्याची आवश्यकता‎ असल्याचे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्य‎ महाराज देगलूरकर यांनी केले.‎ बीड येथील धुंडीराजशास्त्री‎ पाटांगणकर नगरी येथे आयोजित श्रीमद्‎ भागवत कथा ज्ञानयज्ञातील पहिले पुष्प‎ अर्पण करताना ते बोलत होते. या‎ कथेच्या निमित्ताने समितीच्या वतीने‎ अमृताश्रमस्वामी महाराज, महादेव‎ महाराज चाकरवाडीकर, कैवल्य‎ महाराज, पद्मनाभ महाराज व्यास यांचे‎ पूजन करण्यात आले.

समितीचे‎ अध्यक्ष विनायक महाराज पाटांणकर,‎ एकनाथ महाराज पुजारी, कार्याध्यक्ष‎ दिलीप खिस्ती, अमोल शास्त्री जोशी,‎ रामराजे राक्षसभूवनकर, श्रीनिवास‎ कुलकर्णी, नवनाथ कुलकर्णी, विकास‎ उमापूरकर, सतीश कुलकर्णी, चिन्मय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पुजारी, जयंत पत्की उपस्थित होते.‎ पुढे बोलताना चैतन्य महाराज‎ म्हणाले, बीड येथील भागवतकथेच्या‎ निमित्ताने वै. पाटांगणकर दादांच्या‎ आठवणीने कंठ दाटून येतो. त्यांच्या‎ साक्षीने बीड येथील श्रीमद् भागवत‎ कथेची संकल्पना उदयास आली.‎ श्रीमद् भागवत ग्रंथ हा संयम‎ शिकवणारा ग्रंथ असून प्रपंचात उत्साह‎ तर परमार्थात संयम आवश्यक आहे.‎

अविवेक अनेक आपत्तींना जन्म देतो‎ तर विवेक संयम शिकवतो.‎ विचाराशिवाय कोणतीही गोष्ट करणे‎ व्यर्थ आहे. मनाच्या मागे विनाकारण‎ पळू नये तर मनावर ताबा‎ मिळवण्यासाठी श्रीमद् भागवत कथा‎ श्रवण करणे गरजेचे असून श्रीमद्‎ भागवत ग्रंथ भगवान श्रीकृष्णाच्या‎ जीवन चरित्रावरील अनेक सुंदर कथा,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रसंग, घटना या मनाला मोहक‎ करणाऱ्या असून घटनात रमण्यापेक्षा‎ ज्या कारणाने हे प्रसंग, घटना, व्यक्ती‎ चरित्र निर्माण झाले त्यांच्या जीवन‎ चरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी ही‎ कथा आहे.‎ साध्य हे व्यापक असावे, संत हे‎ जन्मताच साध्य ठरवूनच जन्माला‎ येतात. साध्य हे व्यापक असावे हे‎ आपले भागवत ग्रंथ शिकवतो.‎ आपल्याशी होणे हा गुन्हा नाहीतर ध्येय‎ मोठे ठेवणे पुरुषांत आहे.

संकुचित ध्येय‎ ठेवणे हा तर गुन्हा आहे. जगाला‎ आदर्श शिकवणारे संत महात्मे याच‎ भारत देशात जन्मले. मानवी देह हा‎ दुर्लभ असून नर देह कर्तव्याने फुलून‎ जातो त्यामुळे चांगली कर्म करा.‎ जीवनाची ध्येय निश्चितीसाठी वारंवार‎ श्रीमद् भागवत कथा श्रवणाची गरज‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असल्याचे त्यांनी कथेच्या शेवटी‎ सांगितले.‎ यावेळी मनोगत कैवल्य महाराज‎ म्हणाले की श्रीमद् भागवत कथा‎ श्रवणाने उपस्थित प्रत्येकाच्या‎ मनामनात भगवंत वास करीत असतो.‎ भाग्य असल्याशिवाय संतांचे दर्शन‎ भागवत श्रवण होत नाही. श्रीमद्‎ भागवत कोणाच्या मुखातून श्रवण‎ करावे यालाही मोठे महत्त्व असून श्री‎ गुरु चैतन्य महाराज देगलूरकर‎ ज्ञानसागर असल्याचे त्यांनी सांगितले.‎ सूत्रसंचालन प्रज्ञा रामदासी यांनी केले‎ तर उपस्थितांचे आभार समितीचे‎ अध्यक्ष विनायक महाराज पाटांगणकर‎ यांनी मानले. कथेच्या सांगतेला‎ महाआरती करण्यात आली. याप्रसंगी‎ भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती‎ होती.‎

शोभायात्रेने वेधले लक्ष‎ कथा प्रारंभी सहयोग नगर भागातील‎ श्री स्वामी समर्थ मंदिरापासून श्रीमद्‎ भागवत ग्रंथाची शोभायात्रा‎ काढण्यात आली. बंकट स्वामी‎ मठाचे मठाधिपती लक्ष्मण महाराज‎ मेंगडे यांनी या शोभायात्रेत सहभाग‎ घेतला तर ठिकठिकाणी या‎ शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात‎ आली. या शोभायात्रेत बँडपथक,‎ लेझीम पथक, अश्वधारी, टाळकरी‎ मंडळी, कलशधारी महिला आदींनी‎ सहभाग घेतला. रांगोळी रेखाटून‎ शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...