आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी हिताचा विचार करण्यात आलेला आहे. ही विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची नांदी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख उपेंद्र कुलकर्णी यांनी केले. सिद्धेश्वर महाविद्यालयात आयक्यूएसी विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक उद्बोधन वर्गात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी भा.शि.प्र.संस्था अंबाजोगाईचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रवीण सरदेशमुख, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश दुगड, स्थानिक प्रशासन समितीचे कार्यवाह विष्णुपंत कुलकर्णी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड, प्राचार्य प्रो. सुहास मोराळे उपस्थित होते. पुढे बोलताना उपेंद्र कुलकर्णी म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केंद्र सरकारने देशभर प्रभावीपणे सुरू केली आहे.
या शैक्षणिक धरणांमध्ये विद्यार्थी केंद्रभूत माणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रभूत असा अभ्यासक्रम तयार केला गेला आहे. मग यातून भविष्यात पदवी घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली चमक दाखवतील तसेच देशाच्या शैक्षणिक विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असेल. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. सुहास मोराळे यांनी केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. युवराज मुळये यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना यांनी मानले. या कार्यक्रमास आय.क्यु.ए.सी. विभागाचे समन्वयक डॉ. विनायक देशमुख तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.