आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड शहरात होत असलेल्या विकासकामांचा वाढता आलेख जनतेसमोर स्पष्ट आहे. काम मंजूर करून आणून ते पूर्ण करण्यापर्यंत आपला हेतू हा विकासाभिमुख राहिला आहे. लोकांना पण याची हळूहळू जाणीव होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक व्यक्ती आपणाला पाठिंबा देत आहेत. शहराचा विकास हाच एकमेव हेतू असल्याने जनाधार वाढत असल्याचे प्रतिपादन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले. बीड शहरातील प्रकाश आंबेडकर नगर भागातील शहादेव वंजारे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली क्षीरसागर गटात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर हे बोलत होते. त्यांनी शहादेव वंजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.
प्रकाश आंबेडकर नगर भागात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून अनेक विकासाची कामे झाली आहेत. तरी देखील विकासाचा राहिलेला अनुशेष लवकरच भरून काढण्यात येईल. अलीकडच्या काळात या भागाची हद्द मोठ्या प्रमाणात वाढल्याने समस्या देखील वाढल्या आहेत. मात्र या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या-ज्या भागाची हद्द वाढ झाली आहे अशा भागात काम करत असताना रस्ते,नाली पाणी आणि वीज यासह इतर समस्या सोडवाव्या लागतात.
या भागात मोठ्या प्रमाणात गोर-गरीब जनता राहत असल्याने त्या सर्वांना राहण्यासाठी हक्काचे चांगले घर मिळावे यासाठी रमाई आवास घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या अंतर्गत घरकुल मिळवून देण्यासाठी सहकार्य करु, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सुधीर भांडवले, मनोज मस्के, दिपक चौघुले, राजेंद्र कुसळकर, गोरख काळे, शुभम कातांगळे, कल्याण ढोले, अमोल गलधर, माजेद कुरेशी, अनिल वंजारे, विलास चक्रे, शेख शकील, विजय जगधने यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.