आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:प्रत्येक परिस्थितीचा सामना‎ करण्याचे नियोजन करावे‎

आष्टी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्या माणसावर कशी परिस्थिती‎ येईल हे सध्याच्या काळात सांगणे‎ कठीण आहे.त्यामुळे तिचा सामना‎ करण्याचे नियोजन करावे. पण‎ आपण गेल्यावर आपल्या‎ कुटूंबासाठी काहीतरी तुटपुंजी सोय‎ करावी ह्यासाठी माणसाने आपल्या‎ परीने सोय करण्याची गरज आहे,‎ असे प्रतिपादन बबन महाराज‎ बहिरवाल यांनी केले.‎ कडा येथील विठ्ठल सापते यांचा‎ काही दिवसांपूर्वी अपघात झाला‎ होता.त्या अपघातात त्यांचे अपघाती‎ निधन झाले.

त्यामुळे नागेबाबा‎ मल्टीस्टेटने त्यांना विमा कवचमधून‎ १० लाख रूपयांचा विमा मंजूर करत‎ ३ फेब्रुवारी २०२३ रोजी मान्यवरांच्या‎ उपस्थितीत मयताच्या वरसांना घरी‎ जाऊन धनादेश सुपूर्द केला.‎ याप्रसंगी बबन महाराज बहिरवाल‎ बाेलत होे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष‎ पत्रकार गणेश दळवी हे होते.‎ यावेळी विष्णु महाराज आंधळे,‎ निवृत्ती महाराज बोडखे, दादा‎ महाराज चांगुणे, कडा गावचे सरपंच‎ युवराज पाटील, शेरीचे सरपंच‎ संदिप खकाळ, उपसरपंच दिपक‎ सोनवणे, बाळासाहेब वाघुले,‎ नवनाथ औंदकर, रेवननाथ राऊत,‎ आष्टी तालुका पत्रकार संघाचे‎ अध्यक्ष विनोद ढोबळे, रघुनाथ‎ कर्डिले, नितीन कांबळे, प्रविण‎ पोकळे, संजय खंडागळे आदी‎ उपस्थित होते. यासह बँकेच्या वतीने‎ यशवंत मिसाळ, देविदास कदम,‎ पोपट जमधडे, कडा शाखेचे‎ नवनाथ वंजारे, आष्टी शाखेचे‎ संदिप टेकाडे यांच्यासह ग्रामस्थ‎ हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...