आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव सोहळा:जिल्ह्यातील सकारात्मक बाबींची नोंद‎ माध्यमांनी घेणे आवश्यक : क्षीरसागर‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकारिता करताना केवळ नकारात्मक‎ बाबी दाखवण्यापेक्षा समाजात, जिल्ह्यात‎ जे काही चांगले घडते आहे ते दाखवणे‎ ही आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी‎ प्राचार्य डाॅ. दीपा क्षीरसागर यांनी केले.‎ शहरातील अन्विता हॉटेलच्या‎ सभागृहात रविवारी झालेल्या कार्यक्रमात‎ ज्येष्ठ रंगकर्मी कुलदीप धुमाळे यांना‎ सद्भावना पुरस्कार देऊन सन्मानित‎ करण्यात आले. याप्रसंगी त्यांचा‎ सपत्निक सत्कार करण्यात आला.‎

यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ.‎ क्षीरसागर बोलत होत्या. व्यासपीठावर‎ पत्रकार सुशील कुलकर्णी यांची प्रमुख‎ उपस्थितीहोती.‎ यावेळी बोलताना डॉ.दीपा क्षीरसागर‎ म्हणाल्या, शहरातील स्व.राधेश्याम‎ मुंदडा यांच्या स्मृती निमित्त सद्भावना‎ मित्र परिवाराच्या वतीने पहिल्या‎ सद्भावना पुरस्कार सोहळ्याचे‎ आयोजन करण्यात आले.मित्र परिवाराने‎ केलेला सन्मान हा मनाला उभारी देणारा,‎ प्रेरणा देणारा आहे.समाजकारण,‎ राजकारण करत असताना पत्रकारांची‎ भूमिका महत्त्वाची असते, सकारात्मक‎ मांडणी कमी आणि नकारात्मक मांडणी‎ अधिक दिसू लागली आहे.

समाजाच्या‎ हिताचे प्रश्न मांडणे जितके महत्वाचे‎ तितके समाजासाठी केलेले कार्य देखील‎ समोर आले पाहिजे. राजकारणी म्हणून‎ सतत त्याच त्या गोष्टी पेक्षा नवीन काही‎ तरी अपेक्षित आहे. कुलदीप धुमाळे यांनी‎ आयुष्यभर सकारात्मकता ठेवली, माणूस‎ जोडण्याचे काम त्यांनी केले. कला,‎ साहित्य याद्वारे समाजप्रबोधन करण्याचा‎ प्रयत्न केला, आपल्या मित्राच्या‎ स्मृतिप्रीत्यर्थ सद्भावना पुरस्कार देऊन‎ गौरव करावा ही बाब नक्कीच‎ कौतुकास्पद आहे.‎

या प्रसंगी सद्भावना मंडळाचे अध्यक्ष‎ वाय.जनार्धन राव, रोटरीचे अध्यक्ष‎ कल्याण कुलकर्णी, सचिव विकास‎ उमापुरकर, प्रोजेक्ट चेअरमन अमर‎ डागा, नितीन कोटेचा, किशोर बाहेती,‎ गोविंद कासट, पत्रकार महेश वाघमारे,‎ प्रशांत सुलाखे, गायक भरत लोळगे,‎ मंगेश लोळगे, अशोक मंत्री, प्रशांत‎ पवळ, तुकाराम वायभट, अभय कोटेचा,‎ कमलेश मुंदडा, निलेश, शैलेश, सूरज‎ लाहोटी राम मोटवाणी, पुसाराम लददड,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रा.रत्नाकर क्षीरसागर आदींची उपस्थिती‎ होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुनोत यांनी केले तर विश्वनाथ‎ माणुसमारे यांनी आभार मानले.‎

माध्यमांनी जिल्ह्याची बदनामी करू नये : कुलकर्णी‎यावेळी सुशील कुलकर्णी यांनीही बीड जिल्ह्याच्या बाबतीत विविध विषयांवर भाष्य‎ करून जिल्ह्यात काहीतरी चांगले घडते याकडे पाहिले पाहिजे. मीडियाने देखील‎ जिल्ह्याची बदनामी होईल असे कुठलेही वृत्त प्रकाशित करताना विचार केला पाहिजे,‎ घडते एकीकडे आणि बदनामी बीड जिल्ह्याची का? असे सांगून त्यांनी प्रत्येकाने‎ प्रत्येकाबद्दल सदभावना ठेवूनच वागावे असे सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...