आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्यांग महामंडळाचे भागभांडवल वाढवले असले तरी प्रत्यक्षात निधी मिळत नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांना कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज मिळत नाही. दिव्यांग वित्त विकास महामंडळामार्फत नियमितपणे वित्त पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी केली आहे. महामंडळाकडे गेल्या चार-पाच वर्षापासून अनेक दिव्यांगाची कर्ज प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
तसेच काही प्रकरणे मंजूर असूनही त्यांना अर्थ सहाय्य मिळालेले नाही अशी स्थिती आहे. त्याचप्रमाणे थेट ५० हजार रुपये कर्ज योजना व्यवसायासाठी फिरते वाहन योजना यांसह दिव्यांगाना सुरू करायच्या व्यवसायासाठी कोणत्याही योजनेचे अर्ज जिल्हा कार्यालयाकडे उपलब्ध नाहीत. नुकतेच महामंडळाचे भागभांडवल ५० कोटी वरून ५०० कोटी केले. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालयाकडून योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या सर्व योजनांचे अर्ज सर्व जिल्हा कार्यालयात उपलब्ध करून देण्यात यावेत, गेल्या चार-पाच वर्षातील पात्र दिव्यांगाचे प्रलंबित अर्ज तत्काळ निधी देऊन निकाली काढून मंजूर करावेत व दिव्यांगाना व्यवसाय करण्यासाठी वित्त पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा प्रहारच्या वतीने जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.