आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाच्या दिवशी गेवराई तालुक्यातील केकत पांगरीत पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणात ३० जणांविरोधात गेवराई पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या मतदानाच्या दिवशी गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथे मतदानाची वेळ संपत असताना इतर जिल्ह्यांमधून आलेल्या ऊसतोड कामगारांना मतदान करु देण्याच्या कारणावरुन वाद झाला होता.
यात, वाद मिटवताना पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण करुन दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यामुळे तणाव निर्माण झाल होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी गेवराईचे पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पांडुरंग थावरा चव्हाण, अजय उर्फ पप्पू चव्हाण, पांडुरंग चव्हाण यांची पत्नी, मुलगी व इतर २५ ते ३० जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे यासह अन्य कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.