आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:इमानदारीने काम केल्यास‎ समाजात प्रतिष्ठा : सीईओ‎‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इमानदारीने काम केल्यास समाजात‎ प्रतिष्ठा मिळते. आज सेवानिवृत्ती‎ असूनही सकाळीही आसाराम काशीद‎ माझ्याकडे आले होते. जमलेल्या‎ गर्दीवरून त्यांच्या कामाची पावती‎ दिसून येते, असे प्रतिपादन जिल्हा‎ परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‎ अजित पवार यांनी केले.‎ जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षक‎ तथा समग्र शिक्षा बीडचे सहाय्यक‎ कार्यक्रम अधिकारी आसाराम काशिद‎ यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन‎ सोमवारी करण्यात आले होते. त्या‎ प्रसंगी पवार अध्यक्ष पदावरून बोलत‎ होते.

याप्रसंगी वैजीनाथ फुलझळके,‎ अनंत खेडकर, प्रणिता गंगाखेडकर,‎ सविता अर्सुळ,डॉ.दिपाली काशिद ,‎ हिरालाल कराड, भगवान सोनवणे,‎ गौतम चोपडे, नारायण नागरे, मोहन‎ काकडे, नवजीवन पतसंस्थेचे‎ चेअरमन श्रीराम बहिर, मोतीराम‎ नवले, जालिंदर पैठणे, अशोक‎ मसालेकर आदींची भाषणे केली.‎ या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य‎ कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके,‎ सामान्य प्रशासन विभागाचे उप.‎ मुकाअ प्रमोद काळे, महिला‎ बालकल्याणचे मुख्य कार्यकारी‎ अधिकारी चंद्रशेखर केकाण, उप‎ शिक्षणाधिकारी अजय बाहिर,‎ लेखाधिकारी संजय वायदंडे, गट‎ शिक्षणाधिकारी गणेश गिरी, सुनील‎ केंद्रे, श्रीराम टेकाळे, गोपाळघरे, शेख‎ जमीर, लक्ष्मण बेडसकर, बी. के.‎ नांदुरकर, सिद्धेश्वर माटे आदींची‎ यावेळी उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन बापुसाहेब शिंदे यांनी केले‎ तर आभार नानाभाऊ हजारे यांनी‎ मानले. शिक्षणाधिकारी श्रीकांत‎ कुलकर्णी, डॉ. विक्रम सारुक यांनीही‎ सत्कार करून शुभेच्छा दिल्या.‎ सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास‎ समग्र शिक्षाचे कर्मचारी, मित्र परिवार,‎ जिल्हा परिषद कर्मचारी, नातेवाईक‎ मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎ कार्यक्रमाचे नियोजन कुरेशी रफिक,‎ अविनाश गजरे, परसराम अर्सुल,‎ जयलाल राजपूत, गोविंद कोकणे,‎ गिरीश बिजलवाड, शिवाजी अंडिल,‎ इंजि. बाहेगव्हाणकर आदींनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...