आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिंडी‎:शिवप्रेमींनी काढली 30 किलोमीटरची पायी दिंडी‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरातील छत्रपती शिवाजी‎ महाराज यांच्या पुतळ्याच्या संरक्षक‎ भिंतीसह सुशोभीकरण औरंगाबाद‎ पॅटर्न प्रमाणे दर्जेदार करावे या‎ मागणीसाठी तालुक्यातील‎ लिंबागणेश येथुन बीडपर्यंत ३०‎ किलोमीटर अंतराची शुक्रवारी‎ टाळमृदंगाच्या गजरात पायी दिंडी‎ काढण्यात आली.‎ बीड तालुक्यातील लिंबागणेश येथुन‎ शुक्रवारी सकाळी सामाजिक‎ कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या‎ नेतृत्वाखालील पायी दिंडी बीडकडे‎ मार्गस्थ झाली. मांजरसुंबा,‎ कोळवाडी, पाली, बार्शीनाका मार्गे‎ ही दिंडी बीड शहरात दाखल झाली.‎

या पायी दिंडीत अनंतकाका मुळे,‎ गणपत घोलप,बाजीराव दशमे,‎ राजेभाऊ गिरे, रामदास फाळके,‎ पांडुरंग वाणी, विक्की वाणी,‎ हरीओम क्षीरसागर, दामु थोरात,‎ मोहन कोटुळे, पिंपरनई सरपंच‎ बाळासाहेब वायभट, विलास काटे,‎ गणेश घाडगे, कृष्णा वायभट आदी‎ शिवप्रेमी सहभागी झाले होते. बीड‎ शहरातील छत्रपती शिवाजी‎ महाराज यांच्या अश्वारूढ‎ पुतळ्याजवळ ही दिंडी दुपारी‎ पोहचली.

यावेळी नगर पालिकेचे‎ कार्यालयीन अधीक्षक कदम व‎ उपअभियंता जाधव यांना छत्रपती‎ शिवाजी महाराज यांच्या पुतळा‎ सुशोभिकरण तातडीने करण्यात‎ यावे, छत्रपती शिवाजी महाराज‎ चौक परिसरातील बॅनरमुळे शहराचे‎ विद्रुपीकरण होवुन अपघाताचे‎ प्रमाण वाढत आहे. पालिकेचा‎ जाहीरात कर बुडवणाऱ्या‎ विनापरवाना बॅनरवर दंडात्मक‎ करावी या मागणीचे निवेदन देण्यात‎ आले. यावेळी रामनाथ खोड, शेख‎ युनुस, मिलिंद सरपते, बलभीम‎ उबाळे, अॅड .राज पाटील, आनिल‎ माने आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...