आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद:मैत्री विधेयक मंजुरीनंतर सिरसाळा‎ एमआयडीसी क्षमतेने सुरू होणार‎

परळी‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी तालुक्यातील सिरसाळा येथे‎ एमआयडीसी उभारण्यासाठी जमीन‎ अधिग्रहण करण्यात येवुन महा विकास‎ आघाडी सरकारच्या काळात‎ एमआयडीसी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात‎ आले. आता मैत्री विधेयक मंजूर होताच‎ ही एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू होणार‎ असुन या एमआयडीसीच्या माध्यमातून‎ उद्योगांना चालना व रोजगारनिर्मिती बाबत‎ लवकरच निर्णय होणार असल्याचे‎ उद्योगमंत्री उदय सावंत यांनी शुक्रवारी‎ विधानसभेच्या अर्थ संकल्पीय‎ अधिवेशनात बोलतांना सांगीतले. दरम्यान‎ उद्योगमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सिरसाळा‎ येथील ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत‎ झाल्या आहेत.‎ तालुक्यातील सिरसाळा येथे‎ एमआयडीसीची लवकर उभारणी व्हावी‎ म्हणून आमदार धंनजय मुंडे यांनी‎ शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्ष‎ वेधले. तालुक्यात थर्मल पावर स्टेशन,‎ रेल्वे, वाहतूक सुविधा, ज्योतिर्लिंग क्षेत्र‎ असल्याने देशभरातून लोक परळीत‎ येतात.

सिमेंट फॅक्टरी, वीट उद्योग अशा‎ बऱ्याच पूरक गोष्टी उपलब्ध आहेत.‎ शिवाय तालुक्यातील सिरसाळा येथे‎ एमआयडीसीची जमीन अधिग्रहण करून‎ त्या जमिनीस एमआयडीसी क्षेत्र म्हणून‎ महा विकास आघाडी सरकारच्या काळात‎ घोषित करण्यात आले असुन आता‎ एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू करून‎ विकसित करण्याची मागणी अर्थ‎ संकल्पिय अधिवेशनात केली.‎ उद्योगांना परवानगी मिळण्यात सुलभता‎ आणण्यासाठी सादर करण्यात आलेल्या‎ मैत्री विधेयकाच्या चर्चे दरम्यान आमदार‎ धनंजय मुंडे यांनी तालुक्यातील सिरसाळा‎ एमआयडीसी विकसित करण्याबाबत‎ मागणी केली. तेंव्हा राज्याचे उद्योग मंत्री‎ उदय सामंत यांनी घोषणा करत .मैत्री‎ विधेयक मंजूर होताच, सर्वप्रथम बीड‎ जिल्ह्यातील परळीची एमआयडीसी पूर्ण‎ क्षमतेने सुरू करून विकसित करण्यात‎ येणार असल्याचे सांगीतले. परळी‎ मतदारसंघ व जिल्ह्यातील या‎ एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योगांना‎ चालना व रोजगार निर्मितीबाबत लवकरच‎ निर्णय होणार आहे.‎

एमआयडीसी सुरू झाल्यास बेरोजगारांना‎ संधी
सिरसाळा-सोनपेठ मार्गावर प्रस्तावित एमआयडीसी होणार आहे. या ठिकाणी‎ सध्या जमीन आरक्षीत करण्यात आली आहे. या ठिकाणी अजुन बोर्ड सुध्दा‎ लागलेला नाही. एमआयडीसी सुरू झाल्यास सिरसाळा येथील बेरोजगारांना‎ रोजगारची संधी मिळणार आहे.‎

उद्योगांनी गुंतवणूक केल्यास रोजगाराची संधी‎
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण‎ अधिक आहे. मागासलेल्या भागाचा विकास करण्यासाठी विविध उद्योगांनी इथे‎ गुंतवणूक केल्यास, मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यामुळे‎ सरकारने एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू करून विकसित करण्यासाठी पुढाकार‎ घ्यावा. - धनंजय मुंडे आमदार, परळी‎

बातम्या आणखी आहेत...