आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निमंत्रित कवयित्रींचे संमेलन अतिशय प्रतिसादात्मक व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राज्यभरातून कवयित्रींनी आपापल्या वेगवेगळ्या संवेदना वेगवेगळ्या जाणिवा व्यवस्थेवरही प्रश्न मांडण्याचा कवितेतून अतिशय ताकतीने प्रयत्न केला. या कवी संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा उषा किशन भोसले (लातूर) ह्या होत्या. सुरुवातीला त्यांनी सर्व कवयित्रींना शुभेच्छा दिल्या.
नीलिमा देशमुख (जीवनाचा वृत्तांत ), रजनी गिरवलकर ( मीच भेटलो नाही), मीनाक्षी देशमुख (आम्ही निघालो चंद्रावर), शैलजा कारंडे विजया भणगे (सावित्री) वैष्णवी सोमवंशी (नारे), विमल मुदाळे (स्वप्ना मधलं जगणं), श्रीदेवी हांडे (आई), सुकन्या पवार (बेटी जब मा बन जाती है), डॉ.सुरेखा बनकर (दान), सुलक्षणा सोनवणे(शाप), डॉ.मीना घुमे (इच्छाएँ) आणि पुष्पा बगाडे इत्यादी कवयित्रींनी सहभाग नोंदवला. शितल बोधले यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कवी संमेलन रंगत गेले. अतिशय सुंदर आवाजामध्ये सूत्रसंचालन व कवितांनाही त्यांनी त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. शैलजा कारंडे यांची ''बायका असंही खोटं बोलतात'' ही कविता दाद देऊन गेली. अध्यक्षीय भाष्य करताना उषा भोसले यांनी ''कृष्ण धावणार नाही'' या कवितेने व्यवस्थेवर अतिशय परखडपणे भाष्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.