आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई गेवराई आगारात मागील दोन महिन्यांपासून एसटी बसच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. यामुळे आगाराचे आतापर्यंत दररोज ५ लाख रुपये या प्रमाणे ३ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. आतापर्यंत २५ टक्के एसटी बसचे कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले असून गेवराई आगारातून आठ बस सुरू करण्यात आल्या आहेत. मागील ७२ दिवसांपासून विविध प्रकारच्या मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलने सुरू केले आहेत. शुक्रवारी गेवराई आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा ७३ वा दिवस होता.
दरम्यान, गेवराई येथील आगारात एकूण ५९ बसेस असून मागील आठवड्यापासून औरंगाबाद ४, जालना २, आणि सोलापूर २ अशा ८ बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. येथील आगारात ८७ चालक, ११७ वाहक, प्रशासकीय कर्मचारी २२, यांत्रिकी कर्मचारी ३० असून सध्याच्या परिस्थितीत चालक ०८ , वाहक १० तर प्रशासकीय कर्मचारी सर्व २२ तसेच यांत्रिकी १५ हजर आगारात आहेत. दरम्यान सध्या २५% कर्मचारी सध्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. गेवराई आगारात आतापर्यंत ६२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संप अजूनही मागे न घेतल्याने आगारात असा शुकशुकाट आहे.
आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात राज्य सरकारला निश्चित तोडगा काढता आला नाही. हा प्रश्न सरकारने तत्काळ मार्गी लावावा तसेच आम्ही कर्मचाऱ्यांच्या भावना समजू शकतो. -राजेंद्र मोटे, मनसे, जिल्हाध्यक्ष.
कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर हजर राहावे सध्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाचेही आर्थिक नुकसान होत आहे. तरी आगारातील कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेत आपल्या नियोजित कर्तव्यावर हजर व्हावे. -बालाजी अडसुळे, प्रभारी आगारप्रमुख, गेवराई.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.