आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थ्यांनी कौशल्य ओळखून करिअर निवडावे‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना‎ महाविद्यालयातील इतर उपक्रमांमध्ये‎ सक्रीय सहभाग घेतला पाहिजे.‎ यामुळे आपल्या आत असलेल्या‎ विविध कलागुणांना वाव मिळतो.‎ तसेच आपल्या आई-वडीलांचे‎ स्वप्न पुर्ण करण्यासाठी‎ प्रामाणिकपणे अभ्यास करून‎ आपल्या स्वतःमधील कौशल्याचा‎ शोध घेता आला पाहिजे व या‎ कौशल्यावर आधारित करिअर‎ निवडून जीवनात यशस्वी व्हावे असे‎ प्रतिपादन येथील सनदी लेखापाल‎ आदेश नहार यांनी केले.‎ शहरातील बलभीम कला,‎ विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात‎ १२ वी वाणिज्य शाखेच्या‎ विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎

याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून‎ बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य‎ डॉ. वसंत सानप होते तर मंचावर‎ उपप्राचार्य प्रा. विजय गुंड, पर्यवेक्षक‎ प्रा. राम जाधव, प्रा. अश्विनी वावरे,‎ प्रा. प्रशांत धापसे यांची उपस्थिती‎ होती. प्राचार्य डॉ.वसंत सानप‎ अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की,‎ विद्यार्थ्यांनी आपल्या विषयातील‎ सखोल ज्ञान मिळवून आपले‎ स्वतःचे विचार बनवावे व स्वतःची‎ स्वतंत्र ओळख तयार करावी असे‎ आवाहन यावेळी केले.

प्रा. विजय‎ गुंड म्हणाले की, महाविद्यालयीन‎ जीवनात प्राप्त केलेले ज्ञान, अनुभव‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हे आयुष्याची शिदोरी असतात. या‎ ज्ञान व अनुभवांच्या आधारे‎ महाविद्यालयीनच नव्हे तर जीवनाची‎ परीक्षा देखील यशस्वीपणे पार‎ पाडता येते. प्रा. प्रशांत धापसे‎ आपल्या मार्गदर्शनात म्हणाले,‎ गुणपत्रिकेत गुणांची सुज म्हणजे‎ गुणवत्ता नव्हे तर विद्यार्थ्यांचा‎ सर्वांगीण विकास म्हणजे गुणवत्ता‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होय असे ते म्हणाले. याप्रसंगी‎ अंजली वडमारे, अभिषेक मुळे,‎ मानसी क्षीरसागर यांनी मनोगत‎ व्यक्त केले. प्रास्ताविक सिद्धी‎ देशमुख हिने केले. परिचय अभिषेक‎ मुळे याने करून दिला. सूत्रसंचालन‎ मानसी क्षीरसागर, अंजली वडमारे‎ यांनी केले आभार ज्ञानेश्वर यादव‎ याने मानले.‎

संभाषण कौशल्य कोणत्याही‎ व्यवसायाचा आहे पाया‎ आदेश नहार यांनी यावेळी‎ बारावीनंतर वाणिज्य शाखेतील‎ विद्यार्थ्यांना करिअरच्या ज्या‎ विविध संधी आहेत त्याबद्दल‎ मार्गदर्शन केले. श्रीमती अश्विनी‎ वावरे म्हणाल्या की, यशस्वी‎ होण्यासाठी कुठलाही मधला मार्ग‎ नसतो त्यासाठी परिश्रम व‎ चिकाटी आवश्यक असते.‎ विद्यार्थ्यांनी काळाची व समाजाची‎ गरज ओळखून करिअरची निवड‎ केली पाहिजे. संभाषण कौशल्य हे‎ कोणत्याही व्यवसायाचा पाया‎ असतो हे लक्षात ठेवले पाहिजे.‎

बातम्या आणखी आहेत...