आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बहुजन रयत परिषदेने केले आक्रोश आंदोलन‎

केज‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातंग समाजाला सर्वांगीण‎ विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी‎ अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ,‎ ब, क, ड या प्रमाणे वर्गीकरण करून‎ स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे,‎ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे‎ विकास महामंडळामार्फत वाटप‎ केलेले कर्ज माफ करण्यात यावे‎ यासह इतर मागण्यासाठी बहुजन रयत‎ परिषदेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रमेश‎ गालफाडे यांच्या नेतृत्वाखाली‎ गुरुवारी जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोर आक्रोश धरणे‎ आंदोलन करण्यात आले.‎ बहुजन रयत परिषदेच्या वतीने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री‎ लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेशाध्यक्ष‎ रमेशतात्या गालफाडे, महिला‎ आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड.‎ कोमल काळुंके यांच्या नेतृत्वाखाली‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर‎ आक्रोश धरणे आंदोलन करण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आले.

आंदोलनात प्रदेश सरचिटणीस‎ ईश्वर क्षीरसागर, संपर्क प्रमुख‎ अशोक सोनवणे, जिल्हा प्रमुख‎ गोरख मोमीन, जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश‎ पाटुळे, जेष्ठ नेते लालासाहेब शिंदे,‎ बाबुराव गालफाडे, सुधाकर कानडे,‎ रवींद्र क्षीरसागर, महेश धुरंधरे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संगीता बाबरे, सुबाबाई थोरात,‎ अशोक भाकरे, सदाशिव वैरागे,‎ रघुनाथ थोराते, डॉ. चंद्रशेखर गवळी,‎ योगिराज साळवे, प्रदीप उमाप,‎ अरूण सोनवणे, जालिंदर सोनवणे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विक्रम सोनवणे, आत्माराम वाघमारे,‎ दशरथ काळे, शेखर सोनवणे, गणेश‎ कांबळे, पनवेल सानवणे, राधाकिसन‎ सोनवणे, भागवत सोनवणे यांच्यासह‎ कार्यकर्ते सहभागी झाले होते.‎

अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या‎
प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे म्हणाले, शासनाने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना‎ मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा, गेल्या ३० वर्षांपासून लहुजी साळवे आयोगाची‎ स्थापना करण्यात आली. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, संगमवाडी‎ येथील आद्य क्रांति गुरू लहुजी साळवे यांचे स्मारकाचे तत्काळ भूमिपूजन करून‎ कामाला सुरुवात करण्यात यावी, या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत. या‎ मागण्यांचा विचार करून शासनाने मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा राज्यभर रास्ता‎ रोको, जेलभरो अशा प्रकारची आंदोलने लोकशाही मार्गाने करू असा इशारा ही‎ त्यांनी दिला. मागण्याचे निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात‎ आले.‎

बातम्या आणखी आहेत...