आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:कार्यकर्त्यांच्या विश्वासास‎ तडा जाऊ देणार नाही‎

गेवराई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेलगांव ग्रामपंचायत‎ अंतर्गत येणाऱ्या गोपाळ वस्तीवरील‎ दादा माळी व त्यांच्या समवेत अनेक‎ युवकांनी माजी आमदार अमरसिंह‎ पंडित यांच्या नेतृवावर विश्वास‎ ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश‎ केला. कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या‎ विश्वासाला आपण तडा जाऊ‎ देणार नाही, असे प्रतिपादन याप्रसंगी‎ माजी आमदार अमरसिंह पंडित‎ यांनी केले.‎

गोपाळ वस्तीवरील आयोजित या‎ कार्यक्रमात ते बोलत होते.‎ व्यासपिठावर दादा माळी, संजय‎ पवार, राधेश्याम चक्कर, माऊली‎ नवले, राम कदम, आमजत पठाण,‎ गजानन काळे, गजू सोळंूखे यांची‎ उपस्थिती होती. पुढेे बोलतांना माजी‎ आमदार पंडीत म्हणाले, आपल्या‎ गेवराई तालुक्याची अर्थवाहिनी‎ असलेल्या जय भवानी सहकारी‎ साखर कारखाना हा डिसेंबर‎ महिन्यापर्यंत २२ किमीपर्यंतचा ऊस‎ बैलगाडीने उचलणार आहे. तसेच‎‎‎‎‎‎‎‎‎ गाळप क्षमता देखील वाढवणार‎ आहे. ज्या काही संस्था आमच्या‎ ताब्यात आहेत ती कुणा एकाची‎ जहागिरी नाही.

कारण यामध्ये काम‎ करत असताना आम्ही कुठेही‎ राजकीय वैर घेऊन काम करत नाही‎ म्हणून ह्या संस्था चालतात. जनतेचा‎ आजही आमच्यावर विश्वास असून‎ कुठलीही सत्ता नसतांना आपण‎ माझ्यावर जो विश्वास दाखवला‎ आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही,‎ असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.‎ यावेळी विजय माळी, रामदास‎ माळी, सुभाष माळी, ज्ञानेश्वर‎ माळी, रमेश माळी, हरीभाऊ माळी,‎ गोरख माळी, दिलीप माळी,‎ विश्वजित माळी, संभाजी माळी,‎ बन्सी गव्हाणे हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...