आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानगंगा:मुक्त विद्यापीठाची ज्ञानगंगा‎ ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी

केज‎5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्त विद्यापीठ हे खऱ्या अर्थाने‎ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी‎ ज्ञानगंगा ठरत आहे. त्याचा सर्वच‎ क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होत‎ असून ही ज्ञानगंगा घरोघरी व‎ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी‎ सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत,‎ असे आवाहन विठ्ठलगड शिक्षण‎ प्रसारक मंडळाचे अध्यक्ष‎ विजयकांत मुंडे यांनी केले.‎ केज येथील प्रा. डॉ.‎ विश्वनाथराव कराड बीएड‎ कॉलेज येथे यशवंतराव चव्हाण‎ महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक‎ यांच्या वतीने राबवण्यात येत‎ असलेल्या विविध अभ्यासक्रमांना‎ प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित‎ केलेल्या प्रथम संपर्क सत्राचे‎ उद्घाटन विजयकांत मुंडे यांच्या‎ हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास‎ प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या‎ माधुरीताई मुंडे, प्रा. डॉ. प्रमिता‎ कांबळे यांची उपस्थिती होती.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ प्राचार्य डॉ. किशोर मोरे हे होते. पुढे‎ बोलताना विजयकांत मुंडे म्हणाले‎ की, भविष्यात संस्थेच्या वतीने‎ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी‎ आणखी विविध अभ्यासक्रम‎ राबवून मुक्त विद्यापीठाच्या‎ ‘ज्ञानगंगा घरोघरी’ या मोहिमेच्या‎ यशस्वितेसाठी प्रयत्न करणार‎ असल्याचे ग्वाही दिली.

या वेळी‎ प्राचार्या माधुरीताई मुंडे यांनी‎ आपले मत व्यक्त केले.‎ संपर्क सत्रात एलसीडी‎ प्रोजेक्टरच्या साहाय्याने विषयवार‎ यावर प्राचार्य डॉ. किशोर मोरे व‎ प्रा. डॉ. प्रमिता कांबळे यांनी‎ मार्गदर्शन केले. या संपर्क सत्रास‎ शंभरहून अधिक विद्यार्थी उपस्थित‎ होते. तर परिसंवादाचे सादरीकरण‎ करण्यात येणार आहे. कार्यक्रमास‎ प्रा. प्रविण कन्हेरे, तांत्रिक‎ सहाय्यक प्रा. व्यंकट घुले, केंद्र‎ सहाय्यक प्रा. विक्रम शिंदे, प्रा. डॉ.‎ आशा कांबळे, लेखापाल अजय‎ यादव, सेवक ज्ञानेश्वर वळसे हे‎ उपस्थित होते. आभार प्रा. प्रसाद‎ महाजन यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...