आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिल्लेधारूर तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेसाठी पात्र नागरिक रोज आपले नावे नोंदवण्यासाठी तसेच नोंदवलेल्या नावाची माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र, गेले कित्येक महिने झाले तरी अद्याप या संजय गांधी व श्रावण बाळ योजनेची बैठक झालेली नाही. शेकडो अर्ज प्रलंबित आहे. त्यावर कसलीही कारवाई होऊ शकली नाही. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. गतवेळेस झालेल्या यादीतील मंजूर लाभार्थ्यांना त्याची रक्कम खात्यात अद्यापही मिळाली नाही. मंजूर लाभार्थी यांना देखील लाभापासून वंचित राहण्याची वेळ ओढावली आहे.
परिणामी गरजू लाभार्थी विविध समस्यांना तोंड देत आहेत. या समस्याकडे तहसीलदारांनी जातीने लक्ष देऊन या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार यांनी संबंधित अधिकाऱ्यास सूचना देत सविस्तर माहिती घेऊन गेल्या बैठकीतील मंजूर नावे अंतिम करत लाभार्थ्यांना ताबडतोब त्याच्या खात्यावर रक्कम अदा करावी, असे आदेश दिले व पुढील होणारी बैठक ही लवकरात लवकर घेण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, ज्ञानेश्वर शिंदे, सुनील कावळे, विश्वास शिनगारे, सुभाष पवार, गैबी हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.