आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातत्कालीन पालकमंत्री लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्यातून संभाजीनगर- सोलापूर हा राष्ट्रीय माहामार्ग मिळाला. तर बीड शहराला बायपास रस्ता मिळाला. शहरातील वाहतुकीची कोंडी कमी झाली. परंतु आनंदवाडी ते बार्शी नाका हा रस्ता सिमेंट काँक्रिट व चौपदरीकरण व्हावा अशी नागरिकांची तीव्र मागणी होती. आज जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन या रस्त्यासह जिल्ह्यातील विविध विकास कामांची मागणी केली.
बांधकाम विभागाच्या वार्षिक नियोजनात परळी -बीड मार्गाचे चौपदरीकरण करणे, बीड शहरातील शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्ता सिमेंट काँक्रिटसह चौपदरीकरण करणे, बिंदुसरा नदीवरील पुलाचे रुंदीकरण करणे या प्रमुख मागण्याचा समावेश करण्यात यावा. या मार्गांचे महत्व आणि मार्गावरील वाहतूक बघता या रस्त्यांना प्राधान्य द्यावे वार्षिक नियोजन २०२२-२३ मध्ये सदरील रस्त्यांच्या कामांचा समावेश करून त्याला मंजुरी देण्यात यावी व याकामी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा असा आग्रह धरला. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासीत केले. लवकरच बीडकरांचे स्वप्न साकार होणार आहे. खा. प्रीतम मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदन दिले.
श्रेयवाद रंगणार एकीकडे भाजपच्या वाटेवर जयदत्त क्षीरसागर असताना भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी या विषयावर क्षीरसागर कुटुुंबाने रस्त्याने श्रेय घेण्यासाठी सवयीप्रमाणे पुढे येऊ नये असा खोचक टोला लगावला. यामुळे या रस्त्याचा श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.