आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक मानवाला योग्य दिशा दाखवून भक्ती भावाने परमेश्वराचे नामचिंतन करून आपले आयुष्य सुखी समाधानी जगण्याचा मंत्र संत वचनातून मिळतो. त्यामुळे संत वचन ऐकून यांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्या डॉ.दीपा क्षीरसागर यांनी व्यक्त केले. बीड तालुक्यातील मुळूक येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सप्ताहाची सांगता झाली. याप्रसंगी माजी प्राचार्या डॉ.दीपा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी प्राचार्या क्षीरसागर म्हणाल्या, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.
संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आदी अनेक संत येथे होऊन गेले. बीड जिल्ह्याची भूमी देखील अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. सध्या माणुसकी संपून जात असून अशा परिस्थितीत संताचे विचार वाचा, त्याचे अनुकरण करा, तेच खरा मार्ग दाखवतील. आज संतांचे वचन ऐकून विचार आत्मसात करणं काळाची खरी गरज आहे.
संत ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून भक्तीचा मार्ग सांगितला. संतांचं साहित्य आजच्या काळात देखील समाजात दीपस्तंभासारखे आहे. अंधकारमय जीवनाला प्रकाश देणारं आहे. आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे जेवढे दानधर्म करता येईल तेवढे करून पुण्याचे कार्य करावे त्याप्रमाणे आजही क्षीरसागर कुटुंब दानधर्म करून पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी कार्य करत आले आहे. याप्रसंगी महादेव महाराज, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसंग्रामचे रामहरी मेटे, गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भाविक भक्तांची, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.