आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास:हायब्रीड प्रकल्पांतर्गत 34 किमी रस्त्याचा‎ प्रश्न मार्गी, तीन तालुके जोडले जाणार‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सरकारने प्राधिकरणाकडे‎ विकासाची जबाबदारी सोपवली होती,‎ त्यासाठी राज्य महामार्ग आणि राज्यातील‎ प्रमुख जिल्हा रस्त्यांची देखभाल आणि‎ व्यवस्थापन महाराष्ट्र प्राधिकरणाने‎ सध्याचे रस्ते वाढवण्याचा संकल्प केला‎ होता. त्या अनुषंगाने हायब्रीड अ‍ॅन्युइटी‎ वर महाराष्ट्र सरकारकडून त्यात‎ सुधारणा करून प्रकल्प आधारावर‎ निविदा प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय‎ घेतला तसेच खाला पुरी ता.शिरुर‎ प्राथमिक आरोग्य केंद्राची २.७० कोटीची‎ निविदा प्रकाशित झाली असून या दोन्ही‎ कामासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर‎ यांनी पाठपुरावा केला होता त्याला यश‎ मिळाले आहे‎ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या‎ मागणीनुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री‎ यांच्याकडून १४५ कोटीच्या रस्त्याचा‎ प्रश्न अखेर मार्गी लागला असुन‎ सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्या‎ मार्फत निविदा प्रकाशित झाली आहे.‎ हायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेल मधून ३४ कि.‎ मी. रस्त्याच्या प्रश्न अखेर मार्गी लागला‎ आहे. त्यासाठी १४५ कोटी रुपये खर्च‎ येणार आहे.

यासाठी आता निविदा‎ प्रक्रिया पूर्ण होत असुन दोन पदरी आणि‎ पेव्हड शोल्डर असलेला हा रस्ता कि.मी.‎ ३३.७५ कि.मी. आहे. ३ मार्च २०२३ ला‎ सार्वजनिक बांधकाम विभाग‎ उस्मानाबाद मंडळ येथे पात्र एजन्सीचे‎ नाव जाहीर करण्यात येणार आहे.‎ जिल्ह्यातील रस्ते पॅकेज अंतर्गत हायब्रीड‎ अ‍ॅन्युइटी मोड मधुन पाडळसिंगी पासुन‎ पुढे बीड तालुक्यातील कुक्कडगाव,‎ वडगाव, गुंधा, पिंपळनेर, ताडसोन्ना,‎ केसापुरी परभणी, वडवणी अशा ३४‎ कि.मी. रस्त्याच्या मागणीला आ.जयदत्त‎ क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून अखेर यश‎ मिळाले असून या रस्त्याच्या कामाची‎ निविदा निघाली आहे. रस्त्याच्या या‎ लिंकने गेवराई, बीड, वडवणी तालुके‎ जोडले जाणार आहेत.

यापूर्वीच एका‎ जाहीर कार्यक्रमात आ.क्षीरसागर यांनी‎ याबाबत रस्ता मंजुरीचे संकेत दिले‎ होते.माजी मंत्री क्षीरसागरांच्या प्रयत्नातून‎ पुर्वीच कल्याण-विशाखापट्टणम या‎ राष्ट्रीय महामार्गाला लिंक रोड म्हणून‎ खरवंडी, येळंब, आर्वी, नवगण राजुरी‎ या राष्ट्रीय महामार्गाला मान्यता मिळाली‎ होती.‎ ३७ कि मी साठी १८० कोटी रुपयांची‎ काम आणि हायब्रीड अ‍ॅन्युइटी मधुन‎ राजुरी चिंचपूर ४५ कि.मी साठी १५०‎ कोटी रुपयाची हि दोन कामे जे महा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विकास अघाडी सरकारच्या काळात‎ रखडले होते त्याला आता गती प्राप्त‎ झाली असुन आता ही कामे अंतिम‎ टप्प्यात आहेत. या सर्व रस्त्यांवर येणार्या‎ गावांच्या ग्रामस्थांनी माजी मंत्री जयदत्त‎ क्षीरसागर यांचे अभार मानले आहेत.‎

दळणवळण होणार आता सुसह्य;‎ वाहनचालकांना दिलासा‎ खालापुरी ता.शिरुर प्राथमिक आरोग्य‎ केंद्राचा प्रश्न सद्धा मार्गी लागला असुन‎ सदरील २.७० कोटीची निविदा प्रकाशित‎ झाली आहे. तर रस्त्यामुळे पाडळसिंगी‎ पासुन पुढे बीड तालुक्यातील‎ कुक्कडगाव, वडगाव, गुंधा, पिंपळनेर,‎ ताडसोन्ना, केसापुरीपरभणी, वडवणी‎ अशा ३४ कि.मी. रस्त्याच्या या लिंकने‎ गेवराई बीड वडवणी तालुके जोडले‎ जाणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...