आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी मुधाेळ यांची सूचना:बालविवाह रोखण्यासाठी‎ सतर्कता राखायला हवी‎

बीड‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशासनाच्या प्रयत्नांनी बालविवाह‎ रोखला जातो परंतु नंतरच्या‎ काळात मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण‎ होण्याची वाट न पाहता मुलीचे‎ पालक तिचा विवाह गुपचूप उरकून‎ घेतात. यामुळे या प्रकरणांमध्ये नंतर‎ देखील मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण‎ होईपर्यंत पाठपुरावा करून सतर्कता‎ राखली जावी अशा सूचना‎ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी‎ दिल्या.‎ जिल्हाधिकारी कार्यालयात‎ बालविवाह प्रतिबंध कायदा अंतर्गत‎ जिल्हा टास्क फोर्स ची बैठक‎ जिल्हाधिकारी मुधोळ यांच्या‎ अध्यक्षतेखाली झाली यावेळी त्या‎ बोलत होत्या.

बैठकीला जिल्हा‎ पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,‎ अतिरिक्त मुख्य कार्यकारी‎ अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा‎ परिषदेचे उपमुख्य कार्यकारी‎ अधिकारी चंद्रशेखर केकान व‎ उपमुख्य कार्यकारी अधिकारी‎ गोसावी , जिल्हा क्रीडा अधिकारी ,‎ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा‎ धस तसेच महिला व बालविकास‎ क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे‎ प्रतिनिधी यामध्ये सोनिया हंगे ,‎ मनस्विनी प्रकल्पाच्या अरुंधती‎ पाटील , चाइल्ड लाईनचे‎ समन्वयक रामहरी जाधव, तत्त्व‎ शील कांबळे, अतुल कुलकर्णी,‎ अशोक तांगडे आदी सदस्य यावेळी‎ उपस्थित होते.‎

जिल्ह्यातील बालविवाह‎ रोखण्यासाठी तयार करण्यात‎ आलेल्या आराखड्याबाबत‎ यावेळी सखोल चर्चा झाली आणि‎ आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर‎ करण्यात आला तो जिल्हा महिला‎ व बालविकास कार्यालय व‎ युनीसेफ़ अंतर्गत//"सक्षम//"‎ उपक्रमाच्या माध्यमातून तयार‎ करण्यात आला होता.‎ विविध सदस्यांची मनोगत ऐकून‎ घेऊन व आराखड्याबाबत तयार‎ करण्यात आलेल्या मसुद्याची‎ माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी‎ दीपा मुधोळ यांनी अनेक महत्त्वपूर्ण‎ सूचना केल्या शिक्षण विभागाच्या‎ वतीने सर्व शाळांमध्ये टोल फ्री‎ क्रमांक १०९८ प्रदर्शित करण्याची‎ कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात‎ यावी आणि याबाबत दोन दिवसात‎ अहवाल सादर केला जावा असे‎ स्पष्ट निर्देश दिले.‎

बातम्या आणखी आहेत...