आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:दुष्काळ हटवण्यासाठी खऱ्या अर्थाने‎ आता वॉटर मॅनेजमेंटची आवश्यकता‎

अंबाजोगाई‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्काळ हटविण्यासाठी वॉटर‎ मॅनेजमेंटची गरज असते. पाण्याच्या‎ दुष्काळात शेतकरी व सर्वसामान्यांचे‎ आर्थिक गणित कोलमडते. पाण्याचा‎ दुष्काळ पडू नये म्हणून पाण्याचे नियोजन‎ हवे. सन २०३० नंतर देशात प्यायचे पाणी‎ खूप महाग असेल.जमीनीचे रूपांतर‎ वाळवंटात होत आहे. शेती हा‎ भारतीयांचा प्रमुख उद्योग आहे. उत्पादन‎ वाढले तरच आर्थिक सुबत्ता येईल, असे‎ प्रतिपादन मानवलोक संस्थेचे कार्यवाह‎ तथा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत‎ लोहिया यांनी केले.‎ अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन‎ विद्यालयाच्या विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या‎ दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎ करताना ते बोलत होते.

योगेश्वरी शिक्षण‎ संस्थेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव‎ लोमटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.‎ आधार माणुसकीचा या संस्थेचे‎ संस्थापक ॲड.संतोष पवार,‎ मुख्याध्यापिका अपर्णा पाठक,‎ उपमुख्याध्यापक विलास गायकवाड,‎ पर्यवेक्षक सुभाष शिंदे, रवी मठपती,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विवेकानंद कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी‎ भागवत मसने, गणेश कदम, संमेलन‎ प्रमुख वैशाली भुसा, शिवकन्या सोळंके‎ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.‎ अनिकेत लोहिया म्हणाले, पाण्याचा‎ अपव्यय टाळा. नदीची स्वच्छता‎ ठेवायला हवी. नदी म्हणजे आई होय.‎ नद्या वाहत्या राहायला हव्यात. नद्या‎ वाहत्या राहण्यासाठी मानवलोक संस्था‎ प्रयत्न करत आहे. नद्याचे पावित्र्य भंग‎ करू नका. अलीकडच्या काळात‎ पिण्याचे पाणी घाणीमुळे दुषित होत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.

पाण्यात कॅन्सरचे विषाणू अधिक‎ असून ऐंशी टक्के आजार दुषित‎ पाण्यामुळे होतात रसायनांचा शेतीत‎ वापरा बंद करावा. पिण्याच्या पाण्याचे‎ स्त्रोत अबाधित ठेवावेत. लातूर,‎ उस्मानाबाद व बीड तीन जिल्ह्यातील‎ मांजरा नदीचा अभ्यास सुरू आहे,‎ असेही त्यांनी सांगितले. ॲड.संतोष‎ पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी‎ संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.माणिकराव लोमटे‎ म्हणाले की, अभ्यासासोबतच विविध‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गुणदर्शन प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष‎ सहभाग नोंदवावा.पालक आणि शिक्षक‎ शिक्षणाचे दोन चाके आहेत.पालकांची‎ शिक्षकांऐवढीच विद्यार्थी‎ घडविण्यासाठीची जबाबदारी असते.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत मसने,‎ तिलोत्तमा इंगोले, बी.डी. खोडेवाड,‎ थोरात यांनी केले. उपमुख्याध्यापक‎ विलास गायकवाड यांनी उपस्थितांचे‎ आभार मानले. या कार्यक्रमास योगेश्वरी‎ नूतन विद्यालयाचे विद्यार्थी व पालक‎ मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎

सांस्कृतिक कार्यक्रमात‎ २०० विद्यार्थ्यांचा सहभाग‎ सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यालयाच्या‎ दोनशे विद्यार्थ्यांनी विविध गुणप्रदर्शन‎ केले. लेझीम, देशभक्तीपर गीते, भारुड,‎ एकपात्री नाटकाचा समावेश होता.‎ माऊली माऊली गीत, लेझीमवरील‎ डान्स, लावणी, ‘कष्टाचा रुपया’‎ नाटिका, बुरगुंडा भारुड (एकपात्री‎ अभिनय), जोगवा गीत, तेरी मिट्टी मे‎ मिल जावा या देशभक्तीपर गीतांनी‎ उपस्थितांची मने जिंकली.‎

बातम्या आणखी आहेत...