आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टगारपीटीने त्रस्त:उसनवारीने पिकवलेल्या टरबुजावर‎ गारांचा मारा; पोराची फी भरू कशी?‎; बीडच्या शेतकऱ्याने रडत मांडली व्यथा

संतोष गालफाडे | केज‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी पिकवलेल्या टरबुजाचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले.‎ - Divya Marathi
बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी पिकवलेल्या टरबुजाचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले.‎

अडीच लाख उसनवारी करत टरबुजचे पीक घेतले.‎ अवघ्या एक ते दोन दिवसांत ७० टनांवर टरबूज‎ निघणार होते. व्यापाऱ्यासोबत त्याचा सौदाही झाला,‎ पण गारपिटीच्या माऱ्याने होत्याचे नव्हते झाले. टरबूज‎ ‎ विकून पुण्यात साई बालाजी‎ ‎ इन्स्टिट्यूट येथे एमबीए‎ ‎ शिकणाऱ्या मुलाची साडेचार‎ ‎ लाखांची फीस भरायची होती.‎ ‎ आता उसनवारी कशी फेडू‎ आणि मुलाची फीस कुठून‎ भरू? असा प्रश्न विचारत केज‎ ‎ तालुक्यातील बोरगावचे (बु.)‎ शेतकरी दत्तात्रय भागवत शिंदे यांनी धाय मोकलून‎ रडत आपली व्यथा "दिव्य मराठी''समोर मांडली.‎ दत्तात्रय शिंदे यांची गावालगत शाळेच्या पाठीमागे‎ शेती आहे. शेतातच पत्र्याच्या शेडमध्ये पत्नी, दोन‎ मुली आणि एक मुलगी असे त्यांचे कुटुंब राहते. एका‎ मुलीचा विवाह झालेला आहे. एक मुलगा खासगी‎ वाहनावर चालक म्हणून काम करतो तर दुसरा‎ पुण्याला एमबीएचे शिक्षण घेत आहे.‎

१५ लाख रुपयांचे होणार होते उत्पन्न, पण गारपिटीने सर्व उद्ध्वस्त केले‎

दत्तात्रय यांनी खासगी पतसंस्थेचे व काही हातउसने‎ पैसे घेऊन पाच लाखांची शेतीत गुंतवणूक केली. २‎ एकरवर टरबूज, दीड एकर क्षेत्रावर मिरची, १ एकर‎ क्षेत्रावर काकडी तर वांगे आणि टोमॅटो प्रत्येकी १०‎ गुंठे क्षेत्रावर घेतले होते. दोन एकरवरील टरबूज हे‎ ३ ते ५ किलो आकाराचे झाले होते. रविवारी‎ व्यापारी हे टरबूज घेण्यासाठी येणार होते. ७०‎ टनांवर टरबूज होणार आणि ७ ते ८ लाखांचे टरबूज‎ व इतर पिकांचे मिळून १५ लाखांपर्यंत उत्पन्न होणार‎ होते, पण गारपीटीने सर्व नुकसान झाले.‎

मिरच्या, काकडीही जमीनदोस्त

मिरच्या, काकडीही जमीनदोस्त‎ गारांच्या माऱ्याने दीड एकर क्षेत्रावरील मिरची गळून‎ जमीनदोस्त झाली. त्याचे ४ लाख रुपयांहून अधिक‎ नुकसान झाले. एकर क्षेत्रावरील काकडीची तोडणी‎ सुरू असताना गारपीट झाल्याने वेलीला शिल्लक‎ राहिलेली काकडी ही गारांनी झोपडल्याने त्यांचे २‎ लाख रुपयांचे नुकसान झाले, तर २० गुंठ्यावरील‎ टोमॅटो आणि वांगे याची अशीच अवस्था झाल्याने‎ त्यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले.‎

केजमध्ये १५ गावांत २ हजार शेतकऱ्यांना फटका‎

ऊस, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान‎ गारपिटीमुळे केज तालुक्यातील १५ गावांत मोठ्या‎ प्रमाणात नुकसान झाले. २ हजार १८० शेतकऱ्यांच्या‎ १ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावरील ऊस, ज्वारी, गहू,‎ भाजीपाला, फळबागांचे ३३ टक्क्यांहून अधिक‎ नुकसान झाले आहे. ४९६ शेतकऱ्यांच्या ३८५ हेक्टर‎ क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान‎ झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. मदत‎ कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.‎