आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्व. सुंदरराव सोळंके यांच्या कार्यकाळापासून माजलगाव मतदार संघात सोळुंके घराण्याने ६० वर्षे राजकारण समाजकारण केलं आहे. सुसभ्य आणि सुसंस्कारपणा हा आमच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा स्थाई भाव आहे. शेजुळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आमचा काहीच संबंध नाही.संबंधित घटना निषेधार्थच आहे.दहशतीचे राजकारण आम्ही कधीच केले नाही.जागतिक महिला दिनी हाच का माझा सासरी सन्मान असा भावनिक सवाल उपस्थित करत,मारहाण प्रकरणात जामीन मिळताच मंगल प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत भावना व्यक्त केल्या. अशोक शेजुळ मारहाण प्रकरणात जामीन मिळतातच लोकनेते सुंदरराव सोळंके नागरी पतसंस्थेत बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयदत्त नरवडे,एडवोकेट बी.आर.डक,राहुल लंगडे उपस्थित होते. यावेळी मंगल सोळंके म्हणाल्या, मतदारसंघात आम्ही पोट,पाणी भरण्याच्या योजनेने आलो नाहीत.मतदारसंघाचे आम्ही काही देणे लागतो. या भावनेतून या ठिकाणी काम करत आहोत.लोकनेते सुंदरराव सोळंके साहेबांच्या संस्कारातून आम्ही या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचप्रमाणे महिला सबलीकरणासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे.अनाथ मुलांसाठी काम करीत आहोत.सामाजिक भावनेची जाणीव ठेवून सतत सोळंके घराणे या ठिकाणी काम करत आहे. या वीस वर्षाच्या आमदारकीच्या काळात आम्ही कधीच दहशतीचं राजकारण या ठिकाणी केलं नाही.आम्ही लोकशाहीचा आदर करून कायद्याने आपली लढाई लढणारी लोक आहोत. या प्रकरणात सोळंके घराण्याला विनाकारण गुंतवून या ठिकाणी सुडाचे राजकारण केल्या जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.