आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्तक्षेप:पुरुषांचेच वर्चस्व असलेल्या राजकारणात‎ महिलांनी हस्तक्षेप करावा : शीतल साखरे‎

गेवराई‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून समोर‎ येणे आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय‎ महिलांच्या उद्धारासाठी दुसरा मार्ग नाही.‎ त्यामुळे मुलींनी बालविवाहाला विरोध‎ करून उच्चशिक्षण घ्यावे. समाजाचे‎ आणि पालकांचे मुलींविषयी असलेले‎ गैरसमज दूर करण्यासाठी मुलींनीच‎ पुढाकार घ्यावा. पुरुषांचेच वर्चस्व‎ असलेल्या राजकारणात महिलांनी‎ हस्तक्षेप करून स्वतःला सिद्ध करावे.‎ माझा बालविवाह झाला नाही.

मला‎ राजकारण करताना महिलांची साथ‎ मिळाली आणि म्हणून मी सरपंच होऊ‎ शकले असे प्रतिपादन धोंडराई येथील‎ सरपंच शीतल साखरे यांनी केले.‎ र. भ. अट्टल महाविद्यालय, डाॅ.‎ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयोचे‎ सात दिवसीय निवासी शिबिर रेवकी -‎ देवकी येथे सुरु असून यावेळी बालविवाह‎ बंदी आणि ग्राम विकासात महिलांचे‎ योगदा या विषयावर साखरे बोलत होत्या.‎ रानमळा येथील माजी सरपंच नंदा हिंगे‎ यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाच्या‎ कार्यक्रमानंतर गायिका रेखा जोशी, गायक‎ प्रा. सुनील मुंडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम‎ सादर केला.

एकाहून एक सरस चित्रपट‎ गीतांची सुरेल मेजवानी गावकऱ्यांना या‎ निमित्ताने मिळाली. ''इतनी शक्ती हमे देना‎ दाता'' या प्रार्थनेनंतर ''अधीर मन झाले'',‎ ''रुपेरी वाळूत'', ''निसर्ग राजा'' अशी‎ बहारदार गाणी सादर झाल्यानंतर ''ऐ मेरे‎ वतन के लोगो जरा आँख में भरलो पानी,‎ जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो‎ कुर्बानी'' या गीताने समारोप करताना‎ मैफलीत देशभक्तीचे चैतन्य निर्माण झाले.‎ याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून भगवान‎ देवकते व कमळाजी यमगर, प्रा. संदीपान‎ हिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने‎ गावकऱ्यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा‎ योजना विभागाच्या शिबिरार्थींनी‎ पाहुण्यांचा परिचय करून दिला.‎ सूत्रसंचालन, आभार, प्रास्ताविक केले.‎ राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.‎

बातम्या आणखी आहेत...