आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा जगत:जिल्हा क्रीडा संकुल विकासासाठी‎ 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जिल्हा क्रीडा संकुल‎ विकसित करण्यासाठी आपण राज्य‎ सरकारकडून अकरा कोटी रुपयांचा‎ निधी मंजूर करून आणला आहे.‎ लवकरच हे जिल्हा क्रीडा संकुल‎ विकसित होणार आहे. तसेच शहरातील‎ आझाद मैदानाचाही लवकरच‎ कायापालट केला जाईल. विविध‎ खेळामधून गुणवान खेळाडू पुढे‎ येण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे‎ आयोजन करणे आवश्यक असल्याचे‎ मत आमदार कैलास गाेरंटयाल यांनी‎ व्यक्त केले.‎

राष्ट्रमाता इंदिरा गांधी‎ महाविद्यालयाच्या मैदानावर महात्मा‎ जोतिबा फुले सामाजिक कार्य सेवाभावी‎ संस्था व राष्ट्रमाता इंदिरा गांधी‎ महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त‎ विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन व राजमाता‎ जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ कबड्डी‎ चषक स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत‎ होते. यावेळी विधान परिषद सदस्य‎ राजेश राठोड, प्रथम मंडल स्तंभ निर्माते‎ डॉ. नारायणराव मुंढे, राष्ट्रीय कबड्डीपटू‎ प्रा. सुरेश नवले, ॲड. विजय राख,‎ भास्कर दानवे, जिल्हा क्रीडधिकारी‎ अरविंद विद्यागर, आर. आर. खडके,‎ भानुदास पालवे, मुख्य संयोजक प्रा.‎ सत्संग मुंढे, शेख महेमूद, विजय‎ कामड, सुदामराव सदाशिवे, राम‎ सावंत, ॲड. राहुल हिवराळे आदींची‎ उपस्थिती होती.

कबड्डी हा फुटबॉल,‎ कुस्तीप्रमाणे मर्दानी खेळ आहे, जालना‎ शहरात अनेक गुणवत्ता असलेले‎ खेळाडू आहेत, शहरात क्रीडामय‎ वातावरण असल्याने आपण‎ देशपातळीवरील कुस्ती व फुटबॉल‎ स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.‎ जालना शहरातील क्रीडा क्षेत्राला वाव‎ मिळावा यासाठी आपण सातत्याने‎ प्रयत्न करीत असल्याचे आमदार‎ गोरंटयाल यांनी सांगितले.

तर आमदार‎ राजेश राठोड म्हणाले, कबड्डी हा खेळ‎ ग्रामीण भागाशी नाळ जोडणारा खेळ‎ आहे. जालना जिल्ह्यातील अनेक‎ पोलीस कर्मचारी हे कबड्डी या क्रीडा‎ प्रकारातूनच पोलिस म्हणून सेवेत रुजू‎ झाले आहेत. चांगले खेळाडू निर्माण‎ होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज‎ असून कबड्डीला गत वैभव प्राप्त करून‎ देण्यासाठी प्रयत्न व्हावा, यासाठी‎ सामुदायिक प्रयत्न करावेत, असे‎ आवाहन केले.

भास्कर दानवे यांनी‎ कबड्डी हा ग्रामीण भागातील व मातीतील‎ खेळ समृद्ध व्हावा,अशी अपेक्षा व्यक्त‎ केली. जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद‎ विद्यागर यांनी कबड्डीचा प्रचार व प्रसार‎ होण्याची गरज विशद करून खेळाडूंनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आपल्या खेळातील कौशल्य दाखवावे,‎ असे आवाहन केले. प्रास्ताविकात मुख्य‎ संयोजक प्रा. सत्संग मुंढे यांनी कबड्डी हा‎ ग्रामीण भागातील खेळ आज मागे पडत‎ चालला असल्याचे सांगून कबड्डीला पुढे‎ घेऊन जाण्यासाठीच तसेच कबड्डीचा‎ विकास करण्यासाठी जिजाऊ कबड्डी‎ चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आल्याचे सांगितले. यावेळी स्पर्धा‎ निरीक्षक विजय पाटोळे, स्पर्धा संघ‎ प्रमुख प्रा. भुजंग डावकर, क्रीडा‎ समन्वयक राजाभाऊ थोरात, पंजाबराव‎ वाघ, संतोष नागवे आदींंचा सत्कार‎ करण्यात आला.सूत्रसंचालन प्रा.‎ लहुराव दुरगुडे यांनी तर डॉ. सर्जेराव‎ गिऱ्हे यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...