आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाव ते शेत रस्ता:जालन्यात‎ 1580 पैकी 21 कामे पूर्ण‎, पालकमंत्री अतुल सावे,‎ रोहयोमंत्री भुमरेेंचे दुर्लक्ष‎

‎ ‎ ‎ ‎ जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत व पाणंद रस्ते‎ (गाव ते शेत) योजनेत २०२२-२३ मध्ये मंजूर‎ केलेल्या १५८० पैकी केवळ २१ कामे दीड वर्षात‎ पूर्ण झाली आहेत. प्रशासकीय मान्यता‎ मिळालेल्या ६५७ कामांना अद्यापही सुरू‎ करण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. बोटावर‎ मोजण्याइतकी जी कामे सुरू अाहेत, तीसुद्धा‎ कासवगतीने होत आहेत.‎ जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे‎ यांनी ग्रामीण भागाचा पूर्ण ताकदीने विकास‎ करण्याचे सहा महिन्यांपू्र्वी आश्वासन दिले‎ होते, तर मातोश्री पाणंद रस्ते कामांना सर्वोच्च‎ प्राधान्य दिले जाईल, असे या योजनेची‎ आखणी करणारे रोहयोमंत्री संदिपान भुमरे‎ यांनी सांगितले होते. मंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याने‎ यंत्रणा कामाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे‎ दिसत आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात मजूर‎ तर उर्वरित कामे यंत्राच्या साह्याने करावे‎ लागते. यात जॉबकार्डधारक मजुरांना कामावर‎ बोलावणे, मस्टर जनरेट करणे, मजुरांची‎ दैनंदिन हजेरी नोंदवून ती ऑनलाइन अपलोड‎ करणे अशा प्रत्येक कामावर ग्रामरोजगार‎ सेवक, ग्रामसेवक, अभियंता, गटविकास‎ अधिकारी यांचे नियंत्रण असते. यात थेट‎ मजुरांच्या खात्यावर पैसे जातात. सुटसुटीत‎ प्रक्रिया असूनही दप्तर दिरंगाई होत आहे.‎