आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियाेजन:जुई धरणात उरला 26 टक्के जलसाठा‎

दानापूर‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील जुई धरण यावर्षी‎ फुल्ल भरल्याने आजपर्यंत मोठ्या‎ प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र,‎ सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ‎ होत आहे. त्यातच दोन्ही धरणातून काही‎ शेतकरी आपल्या शेतीसाठी पाणी घेत‎ असल्याच्या कारणामुळे धरणातील‎ पाणी पातळी कमालीची खालावत आहे.‎ प्रशासन वेळीच उपाययोजना करण्याची‎ गरज निर्माण झाली असून भोकरदन‎ शहरासह तालुक्यातील इतर २० गावांना‎ पाणीपुरवठा करणारे दानापुर येथील जुई‎ धरण पावसाळ्यात भरून वाहत होते.‎ आता मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच‎ जुई धरणामध्ये केवळ २६ टक्के‎ पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच जुई‎ धरणातून मोठ्या प्रमाणात मोटारी टाकून‎ पाणी चोरी देखील करण्यात येत आहे.‎ ही पाणी चोरी तात्काळ थांबवणे गरजेचे‎ आहे.‎ भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील‎ जुई धरणातून जवळपास वीस गावांना‎ पाणी पुरवठा होतो जवळजवळ या‎ धरणातून भोकरदन शहराचा‎ तालुक्यातील २० गावांची तहान भागवली‎ जाते. दरम्यान चार वर्षांपूर्वी तालुक्यातील‎ अत्यल्प पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे‎ जुई धरणात जेमतेम पाणी साठा होता.‎

परिणामी तालुक्यातील जनतेला भयानक‎ अशा दुष्काळी परिस्थितीचा सामना‎ करावा लागला होता. पाणीटंचाई‎ रोखण्यासाठी प्रशासनाला रात्रीच्या‎ दिवस करावा लागला होता. परंतु मागील‎ तीन वर्षापासून सलग जोरदार पर्जन्यमान‎ होत असल्याने नदी नाले विहिरी पाजर‎ तलाव धरणे ओव्हरफ्लो होत आहे.‎ त्यामुळे पाणी परिस्थितीत समाधान‎ दिसत आहे. यंदा मात्र, पहिल्यांदाच‎ तापमानात प्रचंड वाढ होत आहे. तसेच‎ जुई धरणातून होत असलेल्या विविध‎ पाणी उपशामुळे या धरणाची पाणी‎ पातळी झपाट्याने खाली होत आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎ परिस्थितीत जुईधरणात २६ टक्के‎ पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे‎ पाझर तलाव कोरडे ठक झाले असून‎ विहिरींनी देखील तळ गाठण्यास सुरुवात‎ केली असल्याने अनेक गावात‎ नागरिकांना आता विहिरीवरून पाणी‎ शेंदून आणावी लागत आहे.

धरणातील‎ पाणी जून पर्यंत पुरेल असा विश्वास‎ तालुका प्रशासनाला असला तरी चोरी‎ बंद केल्याशिवाय हा विश्वास सार्थक‎ ठरणार नसल्याचे दिसत आहे. दरम्यान,‎ भोकरदन तालुक्यातील दरवर्षी‎ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे‎ तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला‎‎‎‎‎‎‎‎‎ तोंड द्यावे लागते दरवर्षी धरणात मुबलक‎ पाणी असल्यावर धरणातून दिवस‎ ढवळ्या होत असलेल्या पाणी चोरीकडे‎ दुर्लक्ष केल्या जात आहे. धरणात‎ पाण्याचा मृत साठा शिल्लक असल्यावर‎ प्रशासन कारवाई करण्यास सामोरे येते हे‎ चित्र दरवर्षीचेच आहे. यंदा मात्र‎ प्रशासनाने वराती मागून घोडे न हकता‎ प्रत्यक्ष कारवाई करून आतापासूनच‎ धरणातील पाणी राखीव ठेवणे गरजेचे‎ आहे. सध्या जुई धरणात २६ टक्के‎ पाणीसाठा उपलब्ध असल्याने भविष्यात‎ पाणीटंचाई निर्माण होऊ शकते असा‎ अंदाज बांधण्यात येत आहे.‎

पाण्याचा अपव्यय टाळावा‎
भोकरदन तालुक्यातील दानपुरातील जुई धरणात सध्या २६ टक्के तर सेलूद येतील‎ धामणात ३९ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत दोन्ही‎ धरणातील पाणीसाठा पुरेल असा अंदाज आहे पाणी चोरी होऊ नये म्हणून परिसरातील‎ शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेले आहे.‎ - सचिन राठोड, उपअभियंता पाटबंधारे विभाग‎

बातम्या आणखी आहेत...