आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेंद्रिय शेती करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत नैसर्गिक शेती योजनेच्या माध्यमातून भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड, चिंचोली, वालसा, डावरगाव, केदारखेडा, वालसा - खालसा या गावातील १५ शेतकरी गटांनी नोंदणी प्रस्ताव आत्मा कार्यालयाकडे केली आहे, तर याच शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून ३०० शेतकऱ्यांनी सुनील ऑर्गेनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही जिल्ह्यातील पहिली सेंद्रिय शेती उत्पादक कंपनी स्थापन केली आहे.
यातील सभासद शेतकऱ्यांना बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात लागवडपूर्व व पश्चात, उत्पादन व विक्री व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन उत्पादक ते ग्राहक साखळी निर्माण केली जाणार आहे. अन्नधान्य आणि संकरित वाणाच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात व असंतुलित वापर, पाण्याचा जास्त वापर, जमिनीची धूप होणे, सेंद्रिय खतांंचा कमी वापर आदी कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकाचा विनाश झाल्याने जमिनी मृत होत चालल्या असून कडक बनत आहेत.
परिणामी जमिनीचा पोत बिघडून जमिनी नापीक होणे अथवा पिकांची उत्पादकता कमी होणे, उत्पादित शेतमालाची प्रत खालावणे, मानव व पशुपक्षी यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणे, मशागतीचा खर्च वाढून रासायनिक निविष्ठाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे उत्पादन खर्च वाढत अाहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीस शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला लसूण दाखवताना वालसा डावरगावचे शेतकरी भाऊसाहेब कऱ्हाळे.
सेंद्रिय फळे, भाजीपाल्याला चव चांगली सेंद्रिय फळे, भाजीपाला व अन्नधान्याची चव चांगली असून याला बाजारभावही अधिक मिळतो, आरोग्यासाठीही पोषक आहे. यामुळे सहा गावातील ३०० शेतकऱ्यांनी एकत्र येत सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढाकार घेतला असून येत्या जून महिन्यापासून या पद्धतीने पीक लागवड केली जाणार आहे, असे वालसा-डावरगाव येथील सुनील ऑर्गेनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे उपाध्यक्ष कैलास कऱ्हाळे यांनी सांगितले.
कंपनीमार्फत सेंद्रिय शेतीला बळ स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त सेंद्रिय शेतीला चालना दिली अाहे, तर संयुक्त राष्ट्राने २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याने जिल्ह्यात सेंद्रिय तृणधान्य ग्राहकाला मिळवून दिले जाणार आहे. - शीतल चव्हाण, प्रकल्प संचालक, आत्मा, जालना
भोकरदन तालुक्यातील ६ गावांतील शेतकऱ्यांचा पुढाकार शेतकऱ्यांना पहिल्या तीन टप्प्यात देणार प्रशिक्षण पहिल्या प्रशिक्षणात सेंद्रिय शेतीची संकल्पना, उद्देश व कार्यपद्धती सांगितली जाईल. आंतरपीक लागवड, मूलस्थानी जलसंधारण, सापळा पिके आदी बाबी शिकवल्या जातील. द्वितीय प्रशिक्षणात पिक नियाेजन, आंतरपीक लागवड, सापळा पिके, बीज प्रक्रिया, किड व रोग नियंत्रण, आदींचा समावेश असेल. तृतीय प्रशिक्षणात पीक वृद्धीवर्धके, तण नियंत्रण, सेंद्रिय प्रमाणीकरण मानके, मालाची प्रतवारी आदींचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.