आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांची गळती थांबावी तसेच सदृड आरोग्य रहावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या पोषण आहार उपक्रमाला प्रशासनाकडून खोडा घालण्याचा प्रकार सुरू झाला आहे. तालुक्यातील तब्बल ३६ शाळांना सहा महिण्यांपासून पोषण आहाराची बीले मिळाली नसल्याने मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत. भोकरदन तालुक्यातील ३६ शाळांना माहे जून ते जानेवारी या कालावधील इंधन व भाजीपाला यांची देयके अद्यापही निघाली नाहीत. वदोड तांगडा केंद्रातील २७ शाळांना हे देयके मिळाली नाहीत यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल धावडा, वालसावंगी, वडोद तांगडा, प्राथमिक शाळांमध्ये धावडा मराठी व उर्दू तसेच वालसावंगी मराठी व उर्दू या मोठ्या शाळांचा समावेश आहेत.
ज्यांचे विद्यार्थी हे २०० हून अधिक आहेत. जून ते आजपर्यंत एक पैसाही इंधन व भाजीपाला याचा मिळाला नाही. पोषण आहार योजनेसाठी पैसे कोठून आणावे हा गंभीर प्रश्न मुख्याध् यापकांना पडला आहे. दोन महिन्यांपूर्वी शिक्षणा धिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊनही अद्याप कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. वरील प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा उपोषनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे नेते अजहर पठाण, रवींद्र काकडे, जिसुफ सय्यद, अनिल बोराडे, दशरथ बडगे, भानुदास काळे आदींनी केली आहे. याबाबत प्रशासनाने तत्काळ गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.