आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोऱ्या होण्यात मुंबई आघाडीवर:रेल्वे प्रवासात अडीच महिन्यांत 6144‎ मोबाइल लंपास, लाेकेशन परराज्यात‎

लहू गाढे | जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • , तपास केवळ ४० टक्के‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

‎ रेल्वे उभी असताना, जात असताना, कुणी ‎ ‎ खिडकीत उभे राहून बोलत असतांना‎ हातचलाखीने रेल्वे प्रवासात दररोज शेकडो‎ जणांचे मोबाईल चोरीस जात आहेत. अडीच ‎ ‎ महिन्यांमध्ये राज्यात ६ हजार १४४ मोबाईल‎ चोरीस गेले आहे. सर्वाधिक मोबाईल चोरी मुंबई ‎ ‎ विभागात आहे. चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी ‎ ‎ महिन्याला ३० ते ४० टक्के मोबाईलचा पोलिसांना ‎ ‎ तपास लागत आहे. पोलिसांनी चोरीस गेलेल्या ‎ ‎ मोबाईलचे ट्रेस केले असता, अनेक मोबाईल हे ‎ ‎ उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये‎ दाखवित असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून‎ देण्यात आली आहे. सर्वाधिक मोबाईल चोऱ्या‎ मुंबई विभागात होत आहे.‎ रेल्वे प्रवासातून मोबाइल चोरीस जाण्याच्या‎ घटना‎ मागील काही महिन्यांपासून वारंवार घडत‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ आहेत.‎ रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची‎ आणि त्यांच्या‎ सामानाची सुरक्षा हे लोहमार्ग‎ पोलिसांचे मुख्य कर्तव्य‎ आहे. रेल्वेत प्रवास‎ करणारे प्रवासी आणि‎ पोलिसांमध्ये सुसंवाद‎ राहण्यासाठी प्रत्येक रेल्वेत‎ काही रेल्वे पोलिसही‎ नियुक्त असतात. परंतु, हे‎ पोलिस प्रत्येक‎ प्रवाशाजवळ जाणे शक्य होत नाही.‎ चोरटे‎‎ गर्दीचा फायदा घेऊन किंवा प्रवासी झोपेत‎ असताना‎ चोऱ्या करीत आहेत. राज्यातील‎ कोकण, छत्रपती संभाजी नगर, पुणे, नाशिक,‎ नागपूर, अमरावती या विविध विभागातील रेल्वे‎ पटर्याहून मोबाईल चोरीस जात आहेत.‎ अडीच महिन्यांत मोबाइल चोरी‎ अडीच महिन्यांत रेल्वे विभागाकडून दिलेल्या‎ माहितीनुसार मुंबई ३६४३, छत्रपती संभाजी नगर‎ १३०७, नागपूर ५६१, पुणे २६१ असे मोबाईल चोरी‎ गेले आहेत.‎

प्रवासात मोबाइल चोरी } प्रवासात सतर्कता बाळगा‎ रेल्वे प्रवासात प्रवाशांनी सतर्क राहावे. मोबाईल‎ वरच्या खिशात न ठेवता ते खालच्या खिशात‎ ठेवावे, चोरीस गेलेले मोबाईल गुन्हा दाखल‎ झाल्यानंतर ट्रेससाठी ठेवले जातात. तपासाचे‎ प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. -गणेश दळवी,‎ पोलिस निरीक्षक, रेल्वे पोलिस, औरंगाबाद.‎‎

चोऱ्यांचे प्रमाण मुंबई विभागात अधिक‎ पोलिस चोरीस गेलेला फोन असा‎ करतात ट्रेस‎ रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीस गेल्यानंतर गुन्हे‎ दाखल होतात. यानंतर संबंधित पोलिस‎ एसपींच्या आदेशाने सदरील मोबाईलचे‎ आयएमईआय क्रमांक सीमकार्ड कंपन्यांना दिले‎ जातात. त्या मोबाईलमध्ये सीम टाकल्यानंतर त्या‎ मोबाईलचे लोकेशन संबंधित सिमकार्ड‎ कंपन्याना मिळते. तो रिपोर्ट पोलिसांना येतो.‎ यानंतर पोलिस आरोपींना शोधतात. अनेक‎ मोबाईल परराज्यात ट्रेस होतात. यामुळे हे‎ मोबाईल शोधतांना अडचणी येतात.‎