आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांत समाधान:भोकरदन तालुक्यात मुबलक जलसाठा;‎ बहुतांशी कोरडवाहू क्षेत्र झाले बागायती‎

विठ्ठल देशमुख | पिंपळगाव रेणुकाई‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्काळ हा नेहमीच भोकरदन‎ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दावणीला‎ बांधलेला. शिवाय सततच्या‎ दुष्काळामुळे शेती व्यवसाय देखील‎ धोक्यात आलेला. परंतु भोकरदन‎ तालुक्यात जलयुक्त शिवार ही योजना‎ शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण‎ ठरली आहे. या योजनेतर्गंत तालुक्यात‎ ठिकठिकाणी राबविण्यात आलेल्या नदी,‎ नाले खोलीकरण व रुंदीकरणामुळे‎ शेतकऱ्यांना पावसाचा पडणारा प्रत्येक‎ थेंब बांधावरच अडविण्यात यश आले‎ आहे.

त्यामुळे कोरडवाहू शेतीला देखील‎ आज बागायती शेतीचे स्वरुप जलयुक्त‎ शिवार योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाले‎ असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत‎ आहे.‎ भोकरदन तालुक्यात खरिप‎ हंगामातील लागवडी योग्य क्षेत्र १ लाख‎ ४ हजार ५२५ हेक्टर आहे. त्यात सरासरी‎ १ लाख ८ हजार क्षेत्रावर लागवड केली‎ जायची. मात्र जलयुक्त शिवाय‎ योजनेमुळे शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधन‎ उपलब्ध झाल्याने सन २०२२-२३ मध्ये १‎ लाख ११ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रावर‎ खरिपाची लागवड झाली. तर यावर्षी‎ रब्बी हंगामात तब्बल ६७ हजार १७७‎ हेक्टरमध्ये मका, हरभरा, ज्वारी, गहू‎ आदी पिकाची लागवड शेतकऱ्यांनी‎ केली आहे. त्यात सर्वाधिक हरभरा‎ पिकाचा पेरा आहे. जलयुक्त शिवार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ योजनेचे फलीत शेतकऱ्यांना दिसु लागले‎ आहे. तालुक्यात दरवर्षी पावसाचे‎ पडणारे पाणी वाया जात होते.

परंतु‎ मागील पाच वर्षापूर्वी शेती विकासात‎ वाढ होऊन शेती समृद्ध व्हावी यासाठी‎ शासनाने गावागावात जलयुक्त शिवार‎ योजनेचे काम प्रभावीपणे हाती घेतले व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ते कृषी खात्याच्या माध्यमातून यशस्वी‎ देखील करुन घेतले. आज तालुक्यात‎ हजारो हेक्टर जमिनीला जलयुक्त शिवार‎ योजनेचा फायदा झाला आहे. विहिरीची‎ पाणी पातळी वाढली असल्याने‎ शेतकऱ्यांच्या उत्पादन दुपटीने वाढ झाली‎ आहे. ज्या ठिकाणी साधे बाजरीचे पिक‎ घेण्यासाठी शेतकरी घाबरत होते त्या‎ ठिकाणी आता शेतकरी गहु व मकाचे‎ पिक घेत आहे.तालुक्यात मागील दहा‎ वर्षात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत‎ मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधाऱ्याची कामे‎ करण्यात आली आहे. दरम्यान दानापूर‎ येथील जुई धरण, पद्मावती धरण, शेलुद‎ येथील धामना धरण, पळसखेड दाभाडी,‎ बानेगाव मध्यम प्रकल्प या धरणातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाणी साठ्यामुळे मोठ्या प्रमाणात‎ जमिनीचे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

‎ केळना, पूर्णा, गिरीजा या नदीवरील‎ कोल्हापुरी बंधाऱ्या तालुक्यातील‎ सिंचनाचा अनुशेष भरून निघाला आहे.‎ शिवाय तालुक्यातील शेतकऱ्यांची‎ मशागत करण्याची क्षमता वाढलेली‎ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक‎ परिस्थितीत मोठा बदल होण्यास मदत‎ होताना दिसत आहे. भोकरदन‎ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलयुक्त‎ शिवार योजना संजीवनी ठरली आहे.‎ शिवाय जलयुक्त शिवार योजनेसोबतच‎ लोकसहभाग,नाम संस्था,मुबंई येथील‎ ईंडियन पल्सेस संघटनेने देखील यामध्ये‎ पुढाकार घेतला आहे.‎

जलयुक्त शिवार वरदान‎
जलयुक्त शिवार योजना भोकरदन व‎ जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी‎ मोठी वरदान ठरली आहे. केंद्रीय रेल्वे‎ राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या‎ प्रयत्नातून २०१४ ते २०१९ या काळात १‎ हजार पेक्षा जास्त कामे या योजनेतून‎ झाली. शिवाय बानेगाव, पळसखेड‎ दाभाडी, रेलगाव या धरणाची कामे‎ झाली. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत‎ सिंचनाचे क्षेत्र दहापट वाढले‎ आहे.जलयुक्त शिवार योजनेतुन‎ तालुक्यातील दुष्काळ पुसण्यास मदत‎ झाली आहे.‎ - संतोष दानवे, आमदार भोकरदन‎

बातम्या आणखी आहेत...