आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने कापसाची गंजी मारून शेतात पत्र्याच्या शेडमध्ये किंवा घरात साठवून ठेवलेला आहे. भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील नंदू बुरकुले या शेतकऱ्याने शेतात पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला चाळीस क्विंटल कापूस सोमवारी दुपारी दोन वाजेदरम्यान अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.
शेतातील शेती साहित्य तसेच जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या भुशाच्या चाऱ्यासह इतर साहित्य जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या शेतकऱ्याच्या पत्र्याच्या शेडला आग लागल्याचे कळताच शेजारील शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.