आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीची‎ बीडीओंकडे मागणी‎:आलापूर ग्रा. पं. ने गरजूंना घरकुलापासून वंचित ठेवले‎

भोकरदन‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आलापुर‎ ग्रामपंचायतीने शेतमजूर,‎ गोरगरिबांसह आदिवासी भिल्ल‎ समाजला जाणीवपूर्वक डावलून‎ धनदांडग्यांना घरकुल योजनेचा‎ लाभ दिल्याने त्याची चौकशी‎ करण्याची मागणी आदिवासी भिल्ल‎ समाजाच्या वतीने गटविकास‎ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली‎ आहे.‎ आलापूर येथे अत्यल्प उत्पन्न‎ गटातील कष्टकरी‎ शेतमजूर(आदिवासी भिल्ल)‎ समाजाचे गरीब लोक असून‎ मोलमजुरी करून आपले‎ उदारनिर्वाह करीत आहे. आतापर्यंत‎ कोणतेच योजनेचा लाभ या‎ लोकांपर्यंत पोहचला नसल्याचा‎ आरोप केला आहे.

विकासापासून‎ कोसोदूर असलेल्या या समाजाला‎ आतापर्यंत कोणत्याच योजनेचा‎ लाभ मिळाला नसुन पंतप्रधान‎ आवास योजने साठीच्या पहिल्या‎ यादीत आदिवासी बिल्ले समाजाचे‎ नावे असताना सदरील यादीतील‎ नावे हेतुपरस्पर डावलण्यात‎ आल्याचा गंभीर आरोप निवेदनात‎ केला आहे. आलापुर गावातील‎ लोकप्रतिनिधींनी व ग्रामसेवकांनी या‎ यादीतील प्राधान्यक्रम देखील‎ बदलला आहे. ज्या लोकांनी पैशाचे‎ व्यवहार केले आशा धनदांडग्यांना‎ ज्यांचे अगोदरचे घरे आहेत‎ अश्याना या योजनेचा लाभ दिला‎ आहे.

सदरील योजनेत अनेक‎ लाभार्थ्यांनी सरपंच, ग्रामसेवक‎ आणि संबंधित अभियंता यांच्याशी‎ चिरीमिरी करून या योजनेचा‎ फायदा घेतला आहे. त्यामुळे‎ पंतप्रधान आवास योजना ड‎ सर्वेमधील प्रतीक्षा यादीव इतर गरीब‎ कल्याण योजनेपासून वंचित‎ असल्यामुळे या सर्व प्रकरणाची‎ चौकशी करून दोषींवर तात्काळ‎ कार्यवाही करावी करुन आमच्या‎ सारख्या कष्टकरी, मजूर जे कि खरे‎ लाभार्थी लाभ देण्याची मागणी केली‎ आहे.

आलापूर येथे प्रत्यक्ष स्थळ‎ पाहणी करून पंचनामा करावा तेव्हा‎ आपणास कळेल या समाजाची‎ व्यथा अशी मागणी केली आहे.‎ तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा‎ लाभ देण्यात यावा आणि सदरील‎ प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन‎ न्याय द्यावा; नसता आपल्या‎ कार्यालयासमोर अमरण उपोषण‎ करण्याचा इशारा देण्यात आला.‎ निवेदनावर सलीम तडवी, रहेमान‎ तडवी, जावेद तडवी, मुस्ताक‎ तडवी, आश्फाक तडवी, मस्तान‎ तडवी, सुलतान तडवी, मुदसर‎ तडवी, रामशेर तडवी, जिलानी‎ तडवी, रशी तडवी, सादीक तडवी,‎ शाहरूख तडवी यांच्यासह २५‎ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...