आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरातून रुसून गेलेली अल्पवयीन मुलगी एका जणाच्या घरी गेली होती. त्या घरच्यांनी त्या मुलीला काही दिवस घरी ठेवून नंतर त्या कुटुंबीयांनी त्या मुलीचा विवाह नाव्हा रोडवरील एका मठात लावून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणात रोहनवाडी येथील एका मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीचे लग्न लावून घेतल्यानंतर मुलीला जालना तालुक्यातील नंदापूर येथील शेतात ठेवले होते, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात मुलीला एकाच्या घरी नेऊन घालण्यासाठी मदत करणाऱ्या रोहनवाडी येथील एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुलगी अल्पवयीन असतानाही लग्न लावणारे भटजी, उपस्थित मान्यवर यांनाही पोलिस चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पथक प्रमुख ए. एस. पाटील, चौरे, डोईफोडे, प्रेमानंद लालझरे आदी करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.