आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी वेळेत कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. बँकांना नेमून देण्यात आलेले पिक कर्जाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावेत.
रब्बी हंगामातील पिक कर्जाचे १०० टक्के उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नियोजन करावे असे सांगत त्यांनी बँकनिहाय पिक कर्ज वाटपाची सद्यस्थिती जाणून घेत योग्य त्या सुचना केल्या. तसेच पिक कर्जासोबत महिला बचतगट व शासनाच्या विविध महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या योजनेमधील कर्जाचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्ह्यातील विविध बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.