आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी ऊन कधी पाऊसधारा:कूलर विकायला आणले ग्राहकांकडून‎ छत्र्यांची मागणी, छत्र्या विकाव्यात की कूलर, व्यापारी संभ्रमात

भोकरदन‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भर उन्हाळ्यात पावसाळ्यापेक्षाही जास्त‎ पाऊस पडत असल्याने शेतकरी तर‎ वैतागून गेले आहेत. शेतातील पिकांचे‎ प्रचंड नुकसान होत आहे. आता‎ शेतकऱ्यासोबत व्यापारी वर्गातही‎ संभ्रमाचे वातावरण आहे.

उन्हाळा आहे‎ म्हणून कुलर विकायला आणले तर‎ आता पाऊस पडत असल्याने ग्राहक‎ छत्र्या मागत आहेत. छत्र्या आणल्या तर‎ कडक ऊन पडत आहे. त्यामुळे छत्र्या‎ विकाव्यात की कुलर विकायला‎ आणावेत हेच समजत नाही.‎ हवामानातील बदलामुळे सर्वत्र गोंधळात‎ गोंधळासारखे वातावरण आहे.

आता‎ पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला‎ आहे.‎ सध्या वातावरणाचा समतोल‎ बिघडला आहे. कडक उन्हाळा सुरू‎ असताना पावसाळ्यापेक्षाही जास्त‎ जोराने पाऊस येत आहे. अवकाळी‎ पाऊस सोबत वादळी वाऱ्यामुळे पिकांचे‎ प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी‎ पावसाने मका, बाजरी, कांदा, कांदा‎ सिडस्, मिर्ची आदी पिके उद्वस्त झाले‎ आहेत. हाता तोंडाला घास हिराऊन गेला‎ अवकाळीच्या संकटाचे आता‎ सरकारकडून सर्वेक्षण होईल पाहणी‎ होईल त्यानंतर नुकसान भरपाई काय‎ मिळेल ती मिळेल, मिळेल की नाही हा‎ सुद्धा प्रश्नच आहे.

या परिस्थितीत‎ शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची‎ अपेक्षा आहे. एकीकडे शेतकरी उध्वस्त‎ झाला आहे तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची‎ हीच परिस्थिती आहे. लग्न सराई मध्ये‎ पावसाने धूमाकूळ घातल्याने‎ बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. कुलर‎ , फ्रीज, रेफ्रिजरेटर, एसी यासाठीचा‎ सीजन असलेला उन्हाळा सुरू‎ झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी सर्व शोरूम फुल‎ केले होते. उन्हाळा सुरू होताच ग्राहक‎ वाढतील व गेल्या दोन वर्षापासून ठप्प‎ पडलेली दुकानदारी सुरू होईल व‎ नुकसान भरून निघेल अशी आशा होती.‎

मात्र आता भर उन्हाळ्यात पावसाळा‎ सुरू झाला आहे. कुलरच्या दिवसात‎ छत्र्या मागण्यासाठी ग्राहक येत आहे.‎ छत्री, रेनकोट ठेवण्याची वेळ आता‎ व्यापाऱ्यावर आली आहे. सतत‎ पडणाऱ्या पावसामुळे काही व्यापाऱ्यांनी‎ छत्र्या रेनकोट ही आणून पाहिले मात्र‎ त्यानंतर कडक ऊन पडणे सुरू झाल्याने‎ छत्र्या रेनकोटचे ग्राहक गायब झाले होते.‎

त्यामुळे पुन्हा कुलर, पंखे यांच्या‎ खरेदीवर भर देऊन ग्राहकांना आकर्षक‎ करण्यास सुरू केले असता आता पुन्हा‎ जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला‎ आहे. त्यामुळे व्यापारीही चक्राऊन गेला‎ आहे. बाजारातील ग्राहक मंदावले‎ आहेत. बाजारपेठेवर परिणाम होत आहे.‎ खर्च वाढला आणि ग्राहक कमी अशी‎ अवस्था बदलामुळे झाली.‎