आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन:वर्गमित्र तब्बल 38 वर्षांनंतर‎ एकत्र, आठवणींना उजाळा‎

टेंभुर्णी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय जीवनानंतर एकमेकांपासून दुरावलेले‎ वर्गमित्र तब्बल ३८ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले.‎ टेंभुर्णी येथील नवभारत विद्यालयातील सन‎ १९८५ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन‎ रविवारी उत्साहात पार पडले. येथील बांगड‎ कृषी फॉर्मवर संपन्न झालेल्या या‎ स्नेहसंमेलनात जुन्या मित्रांनी शालेय‎ जीवनातील आठवणींना उजाळा दिला.‎ यावेळी तीस वर्ग मित्र मैत्रिणी एकत्र आले‎ होते.‎ कार्यक्रमात वर्ग मित्रांचे स्नेहसंमेलनात‎ तत्कालिन शिक्षक मधुकरराव निकम, राम‎ देव, कडूबा गाडेकर, तारामती चव्हाण‎ सहभागी झाले होते.

प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी‎ आपल्या या गुरुजनांचा यथोचित गौरव केला.‎ त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना आपला‎ परिचय दिला. दिवसभर चाललेल्या या‎ स्नेहसंमेलनात वर्ग मित्रांनी गाणी, गप्पागोष्टी‎ आदींद्वारे जुन्या आठवणींना उजाळा दिला.‎ यावेळी प्रत्येक वर्गमित्राला ट्रॉफी देऊन‎ गौरविण्यात आले.

स्नेहभोजनानंतर‎ पाणावलेल्या डोळ्यांनी या वर्ग मित्रांनी‎ एकमेकांचा निरोप घेतला.‎ या स्नेहसंमेलनात सर्जेराव शिंदे, देविदास‎ देशमुख, संजय काबरा, सुरेश देशमुख, फैसल‎ चाऊस, संजय शेजूळ, रमेश इंगळे, सय्यद‎ मतीनोद्दीन,अब्दुल्ला शेख, संगीता काबरा,‎ संध्या क्षिरसागर, मंगल उबरहंडे, रंजना खाडे,‎ सरस्वती शिंदे, दिलीप जाधव, जाफरखा‎ पठाण, महादेव मातोंडकर, दिलीप जबडे,‎ अरुण आमले, संतोष इंगळे आदींनी सहभाग‎ घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...