आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील धानोरा परिसरात असलेल्या बेकायदेशीर वीटभट्ट्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा छावा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष महादेव कदम पाटील यांनी दिला. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेऊन दिलेल्या लेखी निवेदनात महादेव कदम पाटील यांनी म्हटले आहे की, शासनाचे नियम पायदळी तुडवत बेकायदेशीरपणे धानोरा परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू असून या वीटभट्ट्यांमुळे शाळकरी विद्यार्थी शाळा सोडून कामास जातात परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तसेच वीटभट्ट्यांमुळे प्रदूषण वाढ होऊन ग्रामस्थांना विविध आजारांची लागण होत असल्याचे महादेव कदम पाटील यांनी निवेदनात नमूद केले. विनापरवानगी उत्खनन करून तयार केलेल्या विटांची परवाना नसलेल्या वाहनांमध्ये सर्रास वाहतूक केली जात असल्याने अपघात होतात.
असे नमूद करत संघटनेने यापूर्वी दोन वेळा निवेदने देऊनही अद्याप पर्यंत कार्यवाही करण्यात आली नाही. येत्या सात दिवसात कार्यवाही न केल्यास १२ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचाही ईशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.