आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डी‎ स्पर्धा:जालन्यात सलग तीन वर्षे राज्यस्तरीय कबड्डी‎ स्पर्धा आयोजनासाठी कटिबद्ध : आमदार राठोड‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरात राज्यस्तरीय कबड्डी‎ स्पर्धेचे अत्यंत सुरेख नियोजन‎ करण्यात आले होते. तालुका, राज्य व‎ देश पातळीवर कबड्डीचा विकास आणि‎ प्रसिद्धीच्या संधी उपलब्ध करून‎ देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार‎ असून, पुढील सलग तीन वर्ष म्हणजेच‎ सन २०२६ पर्यंत दरवर्षी राज्यस्तरीय‎ आणि देशपातळीवर स्पर्धा‎ आयोजनासाठी आपण कटिबद्ध‎ आहोत, अशी ग्वाही आमदार राजेश‎ राठोड यांनी दिली. राज्यस्तरीय कबड्डी‎ स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.‎ महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक‎ कार्य सेवाभावी संस्था आणि राष्ट्रमाता‎ इंदिरा गांधी महाविद्यालय जालना‎ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा‎ दिन व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त‎ सलग तीन दिवस राज्यस्तरीय कबड्डी‎ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या‎ होत्या.

राष्ट्रमाता इंदिरा गांधी‎ महाविद्यालयाच्या मैदानावर पार‎ पडलेल्या जिजाऊ कबड्डी चषक या‎ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील पुरुष‎ गटाचे विजेतेपद औरंगाबाद येथील‎ भारतमाता क्रीडा मंडळाने तर महिला‎ गटाचे विजेतेपद अहमदनगर‎ जिल्ह्यातील दहीगव्हाण येथील स्व.‎ मारोतराव घुले प्रतिष्ठानने पटकावले.‎ दोन्ही गटातील अंतिम सामने अत्यंत‎ अटीतटीचे आणि चित्तथरारक झाले.‎ महिलांच्या गटात सावित्रीच्या‎ लेकीतील अंतिम झुंज हृदयाचा ठोका‎ चुकवणारी ठरली. सामना बरोबरीत‎ सुटल्यानंतर दोन्ही संघांना ५ चढाईची‎ संधी देण्यात आली, त्यात स्व.‎ मारोतराव घुले प्रतिष्ठानने बाजी‎ मारली. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही‎‎‎‎‎‎‎‎‎ गटातील विजेत्या संघाला ३१ हजार,‎ उपविजेत्या संघाला २१ हजार, तृतीय‎ संघाला ११ हजार तर चतुर्थ संघाला‎ ७१०० रुपयाचे बक्षीस व स्मृतिचिन्ह‎ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात‎ आले.

पारितोषिक वितरण समारंभाच्या‎ अध्यक्षस्थानी आमदार राजेश राठोड हे‎ होते. विशेष अतिथी म्हणून देशातील‎ प्रथम मंडळ स्तंभनिर्माते तथा माजी‎ आमदार डॉ. नारायणराव मुंढे, प्रमुख‎ पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष भास्कर‎ आंबेकर, बीडच्या सहाय्यक पोलिस‎‎‎‎‎‎‎‎‎ निरीक्षक तथा कबड्डीत महाराष्ट्राचे‎ राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या‎ सुरेखा नागरगोजे-धस, छत्रपती‎ पुरस्कार विजेते तथा महाराष्ट्र कबड्डी‎ असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे,‎ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा‎ पायगव्हाणे, मनीषा काटकर उपस्थित‎ होत्या.

तर व्यासपीठावर चषकाचे मुख्य‎ संयोजक प्रा. सत्संग मुंढे, सुघोष मुंढे,‎ संयोजन समितीचे सुदामराव सदाशिवे,‎ प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, आश्लेषा‎ इंग्लिश स्कूलच्या संचालिका शुभदा‎‎‎‎‎‎‎‎‎ मुंढे आदींची उपस्थिती होती. आ.‎ राजेश राठोड म्हणाले, मी हा खेळ‎ टीव्हीवर बघायचो. मात्र, प्रा. सत्संग‎ मुंढे यांनी कबड्डी हा खेळ डोळ्याने‎ पाहण्याची संधी प्रत्यक्ष उपलब्ध करून‎ दिली. प्रथमच राज्यस्तरावर आयोजित‎ केलेल्या या स्पर्धेच्या यशाचे श्रेय‎ राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या‎ स्टाफला जाते. खिलाडूवृत्ती ही‎ मानसिकता असते. जिंकणाऱ्यांनी‎ आनंदोत्सव साजरा करावा असे माजी‎ नगराध्यक्ष भास्कर अंबेकर म्हणाले.‎ ‎ ‎ पंच व गुण लेखकांचाही सत्कार‎ विजेते, उपविजेते, तृतीय, चतुर्थ संघ आणि उत्कृष्ट खेळी करणाऱ्या‎ खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जालना‎ जिल्ह्यात कबड्डी रुजवण्यासह टिकविण्यासाठी झटणारे खेळाडू,‎ सामन्याचे पंच, गुणलेखक यांचा सत्कार करण्यात आला.

पुढील वर्षी १२ ते १४ जानेवारीत स्पर्धा‎ राष्ट्रमाता महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक‎ आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी‎ झाली. यापुढेही राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी‎ आमदार राजेश राठोड हे पाठीशी राहतील.‎

बातम्या आणखी आहेत...