आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षाला 20 लाखांचा खर्च:शहरातील अमृतवनात चार वर्षांपासून होईना‎ सायकल, जॉगिंग पार्क; कंत्राटदाराचे दुर्लक्ष‎

लहू गाढे | जालना‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड कोटी रुपयांचा खर्च करून जालना‎ शहरातील मोती तलावाच्या बाजूला‎ असलेल्या ३२ एकर परिसरात ३३ हजार वृक्ष‎ लावून अमृतवन तयार करण्यात आले.‎ यामुळे हा ऑक्सिजन पार्क बहरला होता.‎ परंतु, मध्यंतरीच्या काळात काही‎ कंत्राटदारांनी थातूरमातूर देखभाल करून‎ नुसती बिले उचलली. यामुळे हे अमृतवन‎ कुपोषित झाले होते. चार वर्षे उलटूनही या‎ ठिकाणी जॉगिंग, सायकलिंग, पॅगोडा पार्क‎ झाले नाही. दरम्यान, मागील चार‎ महिन्यांपासून नवीन कंत्राटदार नेमण्यात‎ आला. चार वर्षांत दाेन कंत्राटदार बदलले.‎ झाडे जळालेल्या ठिकाणी आता पुन्हा नवीन‎ २० हजार झाडे लावण्यात आली आहेत. या‎ वृक्षांना नव्याने ठिबक सिंचन केले आहे.‎ दररोज ३० लाख लिटर फिल्टरचे पाणी दिले‎ जात आहे.

हे वृक्ष जगवण्यासाठी आता‎ वर्षाला नगरपालिकेला वीस लाखांचा खर्च‎ करावा लागणार आहे.‎ केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत‎ जालना शहरातील श्री छत्रपती संभाजी‎ उद्यानाच्या बाजूला असलेल्या परिसरात ३०‎ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.‎ शासनाकडून प्रत्येक शहरात हरित क्षेत्र‎ विकास करण्याच्या अनुषंगाने झाडे‎ लावण्यात येत आहेत. शहराच्या बाजूला‎ अमृतवन तयार करून त्या ठिकाणी‎ नागरिकांना फिरण्यासाठी वापर केला जावा,‎ अशी संकल्पना आहे.‎ दरम्यान, जालना शहरातही असे उद्यान‎ तयार झाले आहे. या परिसरात तब्बल तीस‎ हजार वृक्ष लावले. वन उद्यानाच्या चारही‎ बाजूंनी जाळ्यांचे कंपाउंड केले आहे.‎ झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनही‎ केले होते. परंतु, लागवड झाल्यानंतर याकडे‎ दुर्लक्ष झाल्याने या उद्यानाची अवस्था‎ बकाल झाली होती. अनेक झाडांची चोरी‎ झाली. ठिबक सिंचनाच्या नळ्या, पाइप‎ हेसुद्धा चोरून नेले. अनेक झाडेही जळाली‎ होती. आता चार महिन्यांपासून कंत्राटदार‎ बदलण्यात आला असल्याने या ऑक्सिजन‎ पार्कमध्ये आता पुन्हा हिरवळ होऊ लागली‎ आहे.‎

वृक्षांना फिल्टरचे पाणी‎
लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना‎ शुद्ध पाणी देण्यासाठी या ठिकाणी‎ चार फिल्टर लावण्यात आलेले‎ आहेत. यात दररोज ३० लाख लिटर‎ पाणी दिले जात असल्याची माहिती‎ या वनाची देखभाल करणाऱ्यांनी‎ दिली आहे.‎

२४० जातींची झाडे‎
अमृतवनात मोहगिरी, लिंब, पिंपळ,‎ वड, उंबर, गुलमोहर, सिसम,‎ जांभूळ, पेरू, चिकू, अंजीर, फणस‎ यासह फुलपाखरांसाठी फुलांचीही‎ लागवड करण्यात आली आहे.‎ पक्ष्यांचा वावर राहावा, यासाठी‎ फळांची झाडे लावण्यात आली‎ आहेत. तर, पक्ष्यांना घरटे करुन‎ राहता यावे या उद्देशाने बांबूची‎ लागवडही मोठ्या प्रमाणात‎ करण्यात आली आहे.‎

चार महिन्यांपूर्वीच आले आमच्याकडे कंत्राट‎
अमृतवनातील झाडे जगवण्यासाठी तसेच घनदाट जंगल होण्याच्या दृष्टीने‎ नव्याने २० हजार वृक्षांची झाडे लावण्यात आली आहेत. तुटलेले कुंपण‎ पूर्णपणे बंद केले. नव्याने ठिबक लावून झाडे जगवली जात आहेत.‎ - डॉ. संजय दळे पाटील, व्यवस्थापक अमृतवन, जालना.‎

बातम्या आणखी आहेत...