आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भोकरदन तालुक्यात गहू,‎ हरभरा पिकांचे नुकसान‎

भोकरदन‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह तालुक्यात मंगळवारी‎ जोरदार अवकाळी पाऊस झाला‎ यात वीज कोसळून दोन गाय व‎ एक म्हैस दगावली आहे. या‎ तीनही शेतकऱ्यांचे मिळून दोन‎ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.‎ अवकाळी पावसामुळे गहू‎ आणि मका पिकासह हरभऱ्याचेही‎ मोठे नुकसान झाले आहे.‎ अवकाळी पावसामुळे रब्बी‎ हंगामात पेरलेल्या गहू हरभरा‎ पिकासह बहर आलेल्या आंबा‎ फळबागांचे मोठे नुकसान झालेले‎ आहे. मासनपुर येथील शेतकरी‎ सुनील जाधव यांच्या शेतातील गहू‎ आणि मका पीक पूर्णतः आडवे‎ झालेले आहे.

दरम्यान, अवकाळी‎ पावसाने ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे‎ नुकसान झाले त्यांनी त्याने पिकाचे‎ पीक विमा कडून विमा काढलेला‎ आहे ७२ तासाच्या आत कंपनीकडे‎ तक्रार द्यावी. तसेच‎ १८००४१९५००४ या टोल फ्री‎ नंबरवर कॉल करुन तक्रार‎ नोंदवावी, तसेच‎ Pikvima@aicofindia.c om‎ या ईमेल द्वारे आपण कंपनीला‎ पिकाचे नुकसान झालेला फोटो व‎ विमा पावती पाठवून पण तक्रार‎ करू शकता, असे कृषी विभागाने‎ कळवले आहे. दरम्यान,‎ प्रशासनाने त्वरीत पंचनामे करुन‎ नुकसाान भरपाई द्यावी, अशी‎ मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून‎ केली जात आहे.‎‎

बातम्या आणखी आहेत...