आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमची मुलगी व नात गेल्या सहा वर्षापासून बेपत्ता आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतू, अजूनही मुलगी सापडली नाही. पती व सासरच्यांनी घातपात केला असावा, असा आरोप वृध्द रामदास चव्हाण, आशा चव्हाण व बेपत्ता मुलीचा भाऊ राजेश चव्हाण यांनी केला आहे. जालना शहरातील नरिमन नगर भागात राहणाऱ्या रामदास चव्हाण यांची मुलगी वर्षा हिचा विवाह ९ मे २००१ रोजी जोडमानेगाव येथील सुरेश आसाराम गायकवाड या युवकाशी झाला होता. सुरुवातीचे काही वर्ष संसार चांगला चालल्याने मुलीच्या वडीलांनी मदत म्हणून मुलीला शहरातील जमुनानगर भागात एक घर विकत घेऊन दिले.
सुरेश हा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये कामाला होता. याच ठिकाणी वर्षा देखील कामाला होती आणि यातूनच त्यांचे प्रेम संबंध जुळले आणि ते नात्यातीलच असल्याने दोन्ही परिवाराने रीतिरिवाजानुसार लग्न लावून दिले. परंतु काही वर्षापुर्वी घर विकून सुरेश गायकवाड पत्नीसह खरपुडी येथे राहावयास गेला. तेव्हापासून आपल्याला मुलीशी किंवा नातीला भेटणे व बोलणे देखील करून दिले नसल्याची तक्रार वृद्ध दांपत्य रामदास चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने तत्कालीन पोलिस निरीक्षकांकडे केली होती. मुलीला सासरकडचे छळ करत असल्याची तक्रार देखील कौटुंबिक न्यायालयात दिली असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.