आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानाची प्रतीक्षा:मायबाप सरकार, आणखी किती दिवस‎ पाहावी लागणार आम्हाला मदतीची वाट‎

पिंपळगाव रेणुकाई‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र.

भोकरदन तालुक्यात शासनाकडून‎ खरिपातील दुष्काळ मदत जाहीर करुन‎ तब्बल तीन महिन्याच्या वर कालावधी‎ उलटून गेला आहे. मात्र अद्यापही‎ शेतकऱ्यांना मदतीचा खडकु देखील‎ पदरात पडलेला नाही. याबाबत तालूका‎ प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मदत‎ लवकर मिळण्यासाठी प्रयत्न सुरू‎ असल्याचे महसुल खात्याने सांगितले‎ जात असले तरी प्रशासनाकडून‎ मदतीची तारीख पे तारीख मिळत‎ असल्याने मायबाप सरकार आणखी‎ किती दिवस मदतीची वाट पहावी‎ लागणार अशी भावनिक सादच‎ तालुक्यात शेतकऱ्यांनी शासन दरबारी‎ घातली आहे. खरिपाप्रमाणे रब्बीत‎ देखील निसर्ग शेतकऱ्यांच्या पाठीशी‎ हात धूवून लागला असल्याने शेतकरी‎ परेशान झाले आहेत.‎ यंदा भोकरदन तालुक्यात पावसाने‎ वार्षिक सरासरी ओलाडंली.शिवाय‎ पेरणीनंतर पावसाने काही दिवस‎ सततधार लावुन धरल्याने कोवळी‎ पिंकाचे काही प्रमाणात नुकसान झाले.‎ तरीही शेतकऱ्यांनी खताचे व औषधांचे‎ महागडे डोस देत पिके हातात आणली.‎ अपेक्षित पर्जन्यमानामुळे खरिप‎ हंगामातील पिके चांगलीच बहरली‎ होती. परिणामी चांगले उत्पादन यंदा‎ हाती लागणार म्हणून शेतकरी समाधानी‎ होते.

परंतु दरवर्षी प्रमाणे यंदा देखील‎ निसर्गाने शेतकऱ्यांना हात दाखवित‎ सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पावसाने‎ धुमाकुळ घातला हाेता. सातत्याने‎ झालेल्या पावसाने खरिप पिकाचे मोठे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नुकसान झाले. अनेक भागात जमिनीत‎ पाणी साचल्याने सोंगणी केलेले‎ सोयाबीन पिके पूर्णतः वाया गेली. पिके‎ पिवळी पडून त्यांची वाढ खुटली.‎ शिवाय वादळी वाऱ्यात शेकडो‎ हेक्टरवरील मका पिक जमिनीवर‎ आडवे झाले. तर कपाशीच्या शेतात‎ पाण्याचे डोह साचले. त्यामुळे‎ कपाशीच्या केर्या देखील काळवडंल्या.‎ पिके ऐन घरात येणाच्या काळातच‎ निसर्गाने घात केल्याने शेतकऱ्यांचे कधी‎ न भरुन निघणारे नुकसान झाले. शिवाय‎ अधिक पावसामुळे शेतकऱ्यांचे नगदी‎ पिक म्हणून ओळखल्या जाणारे मिरची‎ पिक देखील पूर्णतः उद्ववस्त झाले.‎ त्यामुळे नुकसान झालेल्या पिकाचे‎ त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत‎ मिळवून देण्याची मागणी झाली.‎ शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचा‎ सुचना महसुल व कृषी विभागातील‎ अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यानुसार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कृषी व महसुल विभागातील‎ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर‎ जात पंचनामे करुन सदर अहवाल‎ शासनाकडे सादर केला होता.‎ शासनाने दखल घेत भोकरदन‎ तालुक्यातील नुकसानग्रस्त‎ शेतकऱ्यांसाठी ७४ कोटी ८ लाख ७५‎ हजार ५८० रूपये मंजुर केले.

या‎ अनुदानाचा लाभ तालुक्यातील ६३‎ हजार ६५४ शेतकऱ्यांना मिळणार आहे.‎ मात्र शासनाने मदत जाहीर जवळजवळ‎ तीन महिन्याचा वर कालावधी लोटला‎ असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात‎ अद्यापही ही मदत वर्ग झाली नसल्याने‎ शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.‎ संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत‎ विचारणा केली तर ते मदतीची प्रकीया‎ सुरू असल्याचे ते सांगत आहे. यंदा‎ खरीपात शेतकऱ्यांच्या हाती काहीच‎ लागले नाही.त्यामुळे रब्बी शेतकऱ्यांनी‎ उसनवारी करुन पूर्ण केली. त्यातही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मागील काही दिवसापासून तालुक्यात‎ बहुतांश ठिकाणी वादळी वारा व‎ अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे‎ नुकसान झाले असल्याने नैसर्गिक‎ संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहे.‎ याकडे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे‎ आहे.‎

संकटाची मालिका‎
भोकरदन तालुक्यात शेतकरी आणि‎ संकटे हे समिकरण दरवर्षी जुळत‎ असल्याने शेतकरी घायघुतीला आले‎ आहेत. शेती मालाला बाजारात अत्यल्प‎ भाव असल्याने तो देखील विक्रीविना‎ अद्यापही घरातच पडून आहे. कपाशीत‎ पिसा झाल्या असल्याने घरात‎ आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.‎ त्यामुळे कुटुंबात तंटे व वाद वाढले‎ आहे. आता रब्बीत देखील हरभरा, गहु,‎ मकाचे भाव पडले असल्याने शेतकरी‎ आर्थिक कंगाल होऊ लागल्याचे चित्र‎ या परिसरात दिसून येत आहे.‎

शासनाने लक्ष द्यावे‎
अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने खरिपात‎ प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शासनाने‎ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर‎ केली खरी माञ अद्यापही मदत‎ शेतकऱ्यांच्या पदरात पडली नसल्याने‎ आणखी किती दिवस मदतीची वाट‎ पहावी लागणार हा प्रश्न आहे. रब्बीत‎ देखील नैसर्गिक संकट शेतकऱ्यांची पाठ‎ सोडायला तयार नाही.यामुळे शेतकरी‎ हतबल झाले आहेत.‎ - राम मयुरे, शेतकरी, पिंपळगाव‎ रेणुकाई.‎

बातम्या आणखी आहेत...