आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळा सुरु होऊन पंधरा दिवस होत आले असले तरी मान्सून अद्यापही दाखल न झाल्यामुळे मृग नक्षत्रात होणाऱ्या पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत.मागील मे महिन्याच्या उत्तरार्धापासून शेतकरी खरीप पूर्व कामात व्यस्त होते.जून महिन्याच्या सात तारखेपर्यंत पाऊस पडेल आणि काळ्या आईची ओटी भरावी या मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामासाठी कंबर कसली होती. परंतू १९ जून तारीख ओलांडली असताना देखील पावसाचे कुठेच चित्र पाहण्यास मिळत नसल्यामुळे यावर्षी मृग नक्षत्र ची पेरणी लांबण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील वर्षी मान्सून पावसाने योग्यवेळी हजेरी लावल्यामुळे खरिपातील पिकांना मोठा दिलासा मिळाला होता. अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना साधता आले त्यामुळे या वेळी लवकरात लवकर वरुणराजाचे आगमन होणे आता गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. असे न झाल्यास उडीद मूग या पिकाला मोठा फटका बसू शकतो. दरम्यान परतूर तालुक्याचे एकूण ६७ हजार हेक्टर लागवडीयोग्य खरिपाचे क्षेत्र आहे. मागील वर्षी कापूस आणि ऊस मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केली होती कापसाला भाव सुद्धा चांगला मिळाला होता त्यामुळे यावर्षी देखील कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र विक्रमी होण्याचे संकेत आहेत. दरम्यान परतूर तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घाई केली त्यामुळे मोठ्या चिंतातूर वातावरणात सदरील शेतकरी आहेत तेव्हा चांगला मान्सूनचा पाऊस होईपर्यंत शेतकर्यांनी लागवडीची घाई करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.