आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील शेलूद व परिसरात मागील सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांच्या जमीनीमध्ये पाणी साठल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप दुष्काळी मदत आलेली नाही.
शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीची रोज प्रतिक्षा करीत आहेत. खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेलुदसह परिसरात सोयाबीन व कपाशी हे मुख्य पीक आहे. या पिकाचे अतिवष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच विम्याची रक्कम शेतकऱ्याकडून घेण्यात आली. मात्र, जेवढा विमा भरला तेवढी रक्कमसुद्धा काही शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टाच केली जात आहे. संबधितांनी लक्ष देऊन रक्कम तत्काळ खात्यावर जमा करण्याची मागणी होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.