आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना जिल्ह्यातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहे. ऑनलाईन साईट गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने नवीन नोंदणी होत नाही. तसेच अनेक लाभार्थींना अडचणी येत आहे.त्यामुळे तत्काळ पीएम किसान योजनेचा लाभ वंचित असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच नुकसानीची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी पण खरीप हंगाम संपला मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज दिले नाही. यामध्ये शेतकऱ्यांनी उसनवारी करून तसेच सावकारी कर्ज काढून पेरणी केली. त्यातच कापसाचे भाव ही घसरल्याने सगळीकडूनच शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून या वर्षीचा शेतसारा वसूल करू नये, अशी मागणी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.