आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र, हे अनुदान अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परतूर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी परतूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने अतिवृष्टी झाल्यानंतर तातडीने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याची घोषणा केली होती.
शासनाच्या घोषणेला सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. दसरा, दिवाळी हे मोठे सण शेतकऱ्यांना अडचणीत साजरे करावे लागले. अनुदान जमा करण्यात शासन जाणीपूर्वक चालढकल करत असल्याचा आरोप करत येत्या आठ दिवसात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर येत्या १३ फेब्रुवारीला उप विभागीय अधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे, शिवाजी महाराज भोसले, रमेश गायकवाड, तात्याराव मोरे, वामन सोळंके, वैजनाथ दराडे आदींनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.